शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

३३५ मुला-मुलींनी काढला घरातून पळ

By admin | Published: January 17, 2017 2:50 AM

२०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मुंबई : रेल्वे स्थानकांत अनेक अल्पवयीन मुले-मुली रेल्वे पोलिसांना सापडतात. त्याबाबत तक्रार दाखल झालेली असल्याने रेल्वे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आणि त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. २०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील ३३५ मुला-मुलींनी घरातून विविध कारणांस्तव पळ काढला होता, अशी माहिती देण्यात आली. मुंबईचे आकर्षण, अभ्यासासाठी पालकांचा दबाव, अंतर्गत वादविवाद आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले-मुली घर सोडून मुंबई गाठतात. मुंबई गाठण्यासाठी त्यांच्याकडून ट्रेनने प्रवास करण्यावर भर दिला जातो. मात्र मुंबईत आल्यानंतर आसरा नसल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांतच आपले बस्तान मांडतात. अशा मुला-मुलींचे पालक त्यांचा शोध घेतानाच रेल्वे पोलिसांकडेही तक्रार करतात. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून त्यांचा यशस्वीरीत्या शोध घेतला जातो. २०१६मध्ये मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ५७२ मुले-मुली सापडली. यात ३३५ जणांनी घरातून पळ काढला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर १५ केसेस या अपहरणाच्या, ५९ केसेस या स्थानकात येताच गर्दीत पालकांचा हात सुटल्याच्या आहेत. तसेच १३९ केसेस या बेपत्ता असल्याच्या आहेत. याशिवाय १२ केसेस या तस्करी तर अन्य १२ केसेस या मानवी तस्करीच्या आहेत. (प्रतिनिधी)