शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

व्यापाऱ्यांकडे ३५ कोटींची थकबाकी

By admin | Published: September 01, 2015 1:47 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याच्या कडता कपातीची ३५ कोटी रुपयांची थकबाकी व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. १५ वर्षेपाठपुराव्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप न्याय

नामदेव मोरे,नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याच्या कडता कपातीची ३५ कोटी रुपयांची थकबाकी व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. १५ वर्षेपाठपुराव्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. बाजार समितीने पैसे वसुलीसाठी पाठविलेल्या नोटीसलाही पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे. याविरोधात शेतकरी हितवर्धक संस्थेने पणनमंत्र्यांकडे अपील केले असून, ते तरी बळीराजाला न्याय देणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठविलेल्या मालामधून कोणतीही अनधिकृत कपात करू नये अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तसे केल्यास संबंधितांवर तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. कांदा - बटाटा मार्केट नवी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी पाठविलेल्या मालामधून प्रत्येक गोणीतून दोन किलो वजनाची रक्कम खराब माल व गोणीचे पैसे या नावाने कपात करत होते. कडता कपात म्हणून ही पद्धत प्रचलित होती. कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांची लुबाडणूक होत होती. याविषयी शेतकरी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष महादेव राऊत यांनी २००० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने दोन किलो कपात चुकीची असून बाजार समितीने नियमाप्रमाणे कारवाई करावी असा आदेश दिला होता. बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे दप्तर तपासणीची मागणी केली होती. परंतु व्यापाऱ्यांनी हिशोब देण्यास नकार दिला. बाजार समिती प्रशासनाने कडता कपात केलेल्या कालावधीमध्ये व्यापाऱ्याकडे किती बटाट्याची आवक झाली याचा तपशील एकत्रित करून जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी व्यापाऱ्यांनी द्यावी अशा नोटिसा बजावल्या. व्यापाऱ्यांनी थकबाकीची रक्कम देण्यास मनाई केली होती. याविषयी पणन संचालक व पणनमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. परंतु दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यात यावी असा आदेश देण्यात आला होता. यानंतर बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना पुन्हा नोटीस पाठविल्या. व्यापाऱ्यांनी युक्तिवाद करून याविरोधात पणन संचालकांकडे अर्ज केला होता. पणन संचालकांनी नोटीसला स्थगिती दिली आहे. शेतकरी हितवर्धक संस्थेने या विरोधात पणनमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. पंधरा वर्षे या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आता काही शेतकऱ्यांनी आमची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावाही केला आहे. काही शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे अर्ज केला आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी पणनमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. बाजार समितीमध्ये बटाटा विक्रीसाठी पाठविलेल्या कौशलेंद्र सिंग या उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्याने कडता कपात केल्याच्या पावत्या बाजार समितीला सादर केल्या आहेत. २२ पावत्यांमध्ये २३,६७५ रुपये कडता कपात केली असल्याचे अर्जात नमूद केले असून त्याचे पुरावेही दिले आहेत. अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी कपात करून घेतले असून त्या सर्वांना न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. कडता म्हणजे काय? : शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेल्या बटाटा व इतर मालाच्या गोणीमधून दोन किलो कपात केली जायची. ५० किलो वजनाची गोणी असेल तर शेतकऱ्यांना फक्त ४८ किलोचेच पैसे दिले जायचे. गोणीसाठीची पिशवी व खराब माल यासाठी दोन किलोचे पैसे कपात करून घेतले जात होते. या पद्धतीला कडता कपात असे संबोधले जात होते. कायद्याप्रमाणे कडता कपात नियमबाह्य असल्यामुळे सन २००० मध्ये ती कपात बंद करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी कपात केलेली रक्कम परत देण्याचा प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्याजासह ही रक्कम ७० ते ८० कोटींपेक्षा जास्त आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळावे व संबंधितांना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी ही मागणी आहे. आता शेतकऱ्यांनीही पैसे परत मिळावे असे अर्ज करण्यास सुरवात केली आहे. बाजार समितीने वसुलीसाठी दिलेल्या नोटिसीला पणन संचालकांनी स्थगिती दिली असून त्याविरोधात आम्ही पणनमंत्र्यांकडे अपील केले आहे. त्यांच्याकडे हा विषय प्रलंबित असून ते काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असल्याची प्रतिक्रिया शेतकरी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष महादेव राऊत यांनी दिली आहे.