शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राज्यभरातील ३५० निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत; निवृत्ती जवळ येऊनही पदोन्नती मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 02:53 IST

१९८९ च्या तुकडीतील अधिकाऱ्यांची संख्या मोठी

जितेंद्र कालेकर ठाणे : राज्य शासनाच्या उदासीन आणि वेळकाढू धोरणामुळे ठाणे-मुंबईसह राज्यभरातील तब्बल ३५० वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनेक वर्षांपासून उपअधीक्षकपदावरील बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १९८९-९० च्या तुकडीतील अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील अनेक अधिकारी निवृत्त झाले. त्यामुळे किमान निवृत्तीपूर्वी तरी पदोन्नती व्हावी, अशी अपेक्षा या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.

सध्या ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ निरीक्षकांची संख्या ५० ते ६० च्या घरात असून राज्यभरात ही संख्या ३५० च्या घरात आहे. पोलीस सेवेत ३० वर्षे सेवा बजावूनही अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही. संपूर्ण महाराष्टÑात अधिकारी हे उपअधीक्षकपदाच्या बढतीकडे डोळे लावून बसले आहेत. सरळ सेवा पद्धतीने उपनिरीक्षकपदी रुजू झालेले १९८९-९० च्या तुकडीतील १२५ तर १९९०-९१ च्या तुकडीतील सुमारे ७० अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अधिकाºयांना निरीक्षक या एकाच पदावर १२ ते १४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. निवृत्तीपूर्वी या वरिष्ठ निरीक्षकांना पदोन्नती द्यावी, याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पोलीस महासंचालकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी या अधिकाºयांची मागणी आहे.उपअधीक्षकपदाच्या ३५० जागा रिक्त : सलग १० वर्षे एकाच पदावर सेवा बजावल्यानंतर पदोन्नती दिली जाते. राज्यभरातील शेकडो निरीक्षकांची सेवा १२ वर्षांपेक्षा अधिक झाली आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये तर उपनिरीक्षकपदावरील अधिकारी निवृत्तीपर्यंत थेट अधीक्षकपदापर्यंतची मजल गाठतो. महाराष्ट्रात सध्या उपअधीक्षकपदाच्या ३५० जागा रिक्त आहेत. अशा वेळी किमान उपअधीक्षकपदाची तरी पदोन्नती देण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी, असेही एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस