शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्ह्यातील ३६७ तलाठी बेमुदत संपावर

By admin | Published: April 27, 2016 3:29 AM

रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी जनसामान्यांच्या विविध कामांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा खोळंबा झाल्याचे सर्वत्र पहायला मिळाले.गेल्या ८ जानेवारी २0१६ पासून, महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याने सर्वसामान्य जनतेशी संबंधित अशा सातबारा उतारे, फेरफार नोंदी, आदि महत्वाच्या दस्तऐवजांकरिता आॅनलाइन प्रणाली सक्तीची करुन, पूर्वीचे हाती नोंदी घालण्याची पद्धत रद्दबातल केली. यामुळे सध्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, सर्वत्र तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसुली कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची महत्वाची कामे अडून राहिली असल्याने, पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी हाती नोंदी घालणे, सातबारा देणे सुरु ठेवावे तसेच सरकारी संगणकांच्या सर्व्हरची क्षमता वाढवून जनसामान्यांची ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांना देवून त्याच्या प्रती राज्याचे महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत.गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी या आॅनलाइन प्रणालीचे कामकाज सुरु झाले व एलएमएस प्रणालीद्वारे महसुली नोंदींचा डेटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यातच तलाठी आॅफिसला प्रिंटर नसणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसणे, कित्येकदा लाइट नसणे, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास तांत्रिक सहाय्यक नसणे अशा अनेक अडचणी तेव्हापासून आजही असल्याचे जोग यांनी सांगितले.