शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

३७ लाख शेतकऱ्यांना देणार धान्याऐवजी पैसे; शासनाकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 9:36 AM

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३७ लाख शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख पैसे देण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिलाभार्थी १५० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील. जानेवारी २०२३पासून योजनेची अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी तूर्त ५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी सदर शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ दिला जात होता. मात्र, जवळपास एक वर्षापासून ही योजना बंद होती. कारण अन्न महामंडळाने धान्य पुरवठ्यास नकार दिला होता.  आता दरवर्षी आधारभूत किमतीत वाढ झाल्यास रोख रकमेतही वाढ होणार आहे. 

...असे आहेत निकष या योजनेत २४ जुलै २०१५ च्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट करण्यासाठी केशरी एपीएल शेतकरी कुटुंबाला ऑफलाइन, ऑनलाइन स्वरुपात अर्ज भरावा लागणार आहे.  ही माहिती तालुकास्तरीय डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या माध्यमातून भरली जाणार आहे. अर्जांची छाननी तहसीलदार करतील. या योजनेत मयत अथवा गाव सोडून गेलेले लाभार्थी वगळण्याच्या सूचना आहेत. यानंतरच यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे.  पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. कार्डमध्ये महिला कुटुंबप्रुमख असल्यास अशा कार्डमध्ये महिलाप्रमुखाला बँक खाते काढावे लागणार आहे.

या १४ जिल्ह्यांत होणार अंमलया योजनेत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी