शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यात पावसाचे २ बळी, कोल्हापूरला महापुराचा धोका टळला; मुसळधारेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:26 IST

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

मुंबई/नागपूर/कोल्हापूर: गेले तीन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्टÑासह विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरला पुराचा संभाव्य धोका टळला आहे. मात्र दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हावामान खात्याने दिला आहे. विदर्भात एकजण ठार झाला असून पुरामध्ये ४९ जणावरे ठार झाली तर मराठवाड्यात वीज पडून एक मुलगी ठार झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्या धोकापातळीकडे वाटचाल करीत असतानाच रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दुपारनंतर सातपैकी तीन दरवाजे बंद होऊन पंचगंगा ३९ फूट या इशारा पातळीवर येऊन स्थिर झाल्याने महापुराचा धोकाही टळला. कागल-मुरगूड मार्गासह कसबा बीड, महे पुलावर पाणी आल्याने करवीर तालुक्यातील ४० गावांचाही संपर्क तुटला. अन्य २२ मार्गही आधीपासूनच बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी पुन्हा वाढ सुरू झाली आहे.

विदर्भात ४९ जनावरे दगावलीभामरागड शहरासमोरील पुराचा वेढा सलग तिसºयाही दिवशी कायम आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे रविवारी पहाटे जनावरांना विजेचा धक्का लागल्याने ४९ जनावरे ठार झाली. शेजारच्या घरावर भिंत कोसळल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी पहाटेघडली.

वीज पडून मुलीचा मृत्यूशेतात मूग तोडणी करीत असताना अंगावर वीज पडल्याने परभणी जिल्ह्यातील धानोरा (देगाव) येथील माधुरी पांडूरंग रणबावळे (१२) ही मुलगी मरण पावली.मुसळधारेचा इशारा९ व १० सप्टेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे़

टॅग्स :Rainपाऊस