शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राज्यात ४० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्राला वादळी पावसाचा फटका ; पंचनामे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 16:01 IST

केंद्र सरकारच्या निकषांनुसार नुकसान भरपाई द्यायची तर या बाधित क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपये लागणार आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण: अहवाल मंत्रिमंडळासमोर, निर्णयाची प्रतीक्षा

पुणे: राज्यातील ४० लाख ३७ हजार हेक्टरला वादळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून राज्याचा एकत्रित अहवाल मदत व पुनर्वसन विभागाने मंत्री मंडळासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या निकषांनुसार नुकसान भरपाई द्यायची तर या बाधित क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपये लागणार आहेत. केंद्र सरकारने ही मदत त्वरीत पाठवावी, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. केंद्राच्या निकषापेक्षा जास्त भरपाई द्यायची असेल तर नियमाप्रमाणे त्याची जबाबदारी राज्याला स्विकारावी लागणार आहे. कोणत्याही पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर ते भरपाईस पात्र समजले जाते. कितीही मोठ्या क्षेत्राचे नूकसान झाले असले तरी भरपाई फक्त २ हेक्टरसाठीच दिली जाते. 

सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले आहे. त्या खालोखाल कापूस व नंतर खरीपातील मूग वगैरे पिके नुकसानीत गेली आहेत.मराठवाड्यातील सोयाबीनचे नूकसान सर्वाधिक असून त्यानंतर कोकणात भातपीक व पश्चिम महाराष्ट्रात अन्य पिके वादळी पावसाने नूकसानीत गेली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने बागायती साठी १३ हजार ५०० जिरायतीसाठी ६ हजार रूपये व फळपिकासाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टरी दिले जातात. 

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी केलेल्या पाहणी दौऱ्यात बागायती, कोरडवाहूसाठी हेक्टरी १५ हजार व फळपिकासाठी २५ हजार रूपये देऊ असे सांगितले. मात्र अद्याप त्याचा अध्यादेश निघालेला नाही, अशी माहिती कृषी विभागातून मिळाली. तोपर्यंत केंद्राच्या निकषानुसार तरी भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पावसाने नुकसान केलेच आहे, दिवाळीपूर्वी मदत मिळाली तर दिवाळी तरी गोड जाईल अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार