शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

डहाणू किनारपट्टीतील ४० गावे २ दिवस अंधारात

By admin | Published: September 18, 2016 2:02 AM

अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती सक्तीने वसूल करणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे डहाणूच्या किनारपट्टीतील भागांतील चाळीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात खितपत पडली

डहाणू : विजेची अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती सक्तीने वसूल करणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे डहाणूच्या किनारपट्टीतील भागांतील चाळीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात खितपत पडली असून येथील ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या वीज महावितरणच्या कारभाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.या भागात गेल्या शुक्रवारपासून धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे येथील लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झालेले असतानाच त्यात भर म्हणून गेल्या दोन दिवसांपासून येथील वीज बेपत्ता आहे. बहाड, बाबला तलाव तसेच बोईसर येथील ३३ के.व्ही. केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने आज शनिवारी पहाटे चार वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र १५ तासानंतर वरोर, वानगांव, फीडर सुरू झाले. परंतु रात्री आठ वाजले तरी चिंचणी फीडर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिड निर्माण होऊन सर्वत्र महावितरणच्या विरोधात आंदोलन उभारण्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो.दरम्यान वीज नसल्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. (वार्ताहर)