शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

४०० डॉक्टरांची तातडीने भरती

By admin | Published: October 14, 2015 3:51 AM

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांची ४०० पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांची ४०० पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागात डॉक्टरांच्या व विशेषज्ञांच्या भरतीवर कोणतेही बंधन नाही. त्यांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या विनापरवानगी गैरहजरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या ९७१ आजारांपैकी बहुतांशी आजारांच्या सेवा घेण्याचे प्रमाण शून्य आहे. म्हणून योजनेत सुधारणा करून इतर आजारांचा समावेश करवा. तसेच, या योजनेतील निधीमध्ये वाढ करणेही आवश्यक आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सेवा सर्वाधिक घेतल्या जात असल्याने त्याचे दर वाढविण्याबाबत विचार करावा, या योजनेंतर्गत नव्याने सहभागी होणाऱ्या रुग्णालयासाठी अटी शिथिल करून रुग्णालयांची संख्या वाढविण्यावर भर देऊन सामान्य नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.खासगी व सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवांचे बळकटीकरण करावे, तसेच याबाबतचा पहिला पथदर्शी प्रकल्प अमरावतीमध्ये राबविण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)