शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

तीन वर्षांत ४00 रेल्वे स्थानके वाय-फाय

By admin | Published: January 23, 2016 4:10 AM

इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.

मुंबई : जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रेल्वेमंत्री आणि गुगलतर्फे २0१८पर्यंत ४00 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. भारतातील व्यस्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा गुगलमार्फत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात ही सुविधा सुरू करण्यात आली. यानंतर वांद्रे टर्मिनस, दादर त्यानंतर अंधेरी, बोरीवली, सुरत, अहमदाबाद, बडोदा स्थानकात वाय-फाय सुविधा दिली जाणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात सुरू करण्यात आलेली वाय-फाय सेवा मोफत आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून पहिल्या एक तासानंतर त्याचा वेग मात्र कमी होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. एकाच वेळी ५0 हजार जण वाय-फाय सुविधेचा वापर करू शकतात. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी (पान ९ वर)कसे वापराल वाय-फायफोनमधील सेटिंगमधून वाय-फाय निवडा.त्यानंतर रेलवायर नेटवर्क निवडून रेलवायर डॉट कॉमवर ब्राऊजर सुरू करा.त्यानंतर स्क्रीनवर फोन नंबर टाइप करा आणि रिसिव एसएमएस प्रेस करा.एसएमएसच्या माध्यमातून चार डजिटचा एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) कोड मिळेल. हा कोड वाय-फाय लॉगिन स्क्रीनवर एंटर करा. त्यानंतर मोफत वाय-फाय सेवा मिळेल.वायफाय सेवा सुरु केली असून प्रवाशांना त्याचा फायदा होईल. वायफाय सेवा देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यातला होता. त्यानंतर ही सेवा प्रथम मुंबई सेन्ट्रल स्थानकात सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला २0१६ पर्यंत १00 स्थानकांवर वायफाय देण्यात येईल आणि त्यानंतर अन्य स्थानकांवर. दक्षिण पूर्व एशिया आणि भारतातील गुगलचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले की,२0१८ पर्यंत एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्थानकात येणाऱ्या १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. कार्यक्रम दोन तास लेट शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई सेन्ट्रल स्थानकात होणारा वायफाय सेवेचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता सुरु झाला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांना ताटकळत राहावे लागले. विमानप्रवासाला वेळ लागल्याचे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितांची माफी मागितली.