शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 7:09 AM

ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मनोज माेघे -

मुंबई : वर्षभरात लागणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनहीकेंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे. ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

राज्य सरकारकडून कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, पीकविम्याऐवजी नुकसानभरपाईसाठी अनुदान यासारख्या योजनांद्वारे लाभ दिला जात आहे. त्याही पुढे जात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ची घोषणा करण्यात आली. 

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रूपये जमा होतात. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे १३ हप्ते म्हणजे २६ हजार रूपये जमा झालेत. त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रूपये जमा होणार आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य मिळून १२ हजार रूपये वर्षाला जमा होणार आहेत. 

निधीची तरतूदकोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.  त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

लाभार्थ्यांच्या संख्येला कात्रीकेंद्राच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून १ कोटी १५ लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले. मात्र करपात्र तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाल्याचे लक्षात येताच या यादीला कात्री लावण्यात आली. 

लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांकडून भूमिअभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. या छाटणीत अनेक शेतकरी अपात्र ठरले आणि ही संख्या ८१ लाखांपर्यंत खाली आली. त्यामुळे आता ही अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार