शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राज्यातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकला

By admin | Published: September 10, 2016 1:51 PM

जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ अखेर या आठ महिन्यांत ६९१ जणांनी स्वीकारलेल्या लाचेतील व अन्य भ्रष्ट्राचार प्रकरणातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकल्याची माहिती समोर आली आहे.

आप्पासाहेब पाटील, आॅनलाईन लोकमत
सोलापूर, दि. १० -  अभियोगपूर्व मंजुरी मिळेना, तपास कामात विलंब, दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई, या ना अशा अनेक कारणांमुळे जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ अखेर या आठ महिन्यांत ६९१ जणांनी स्वीकारलेल्या लाचेतील व अन्य भ्रष्ट्राचार प्रकरणातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकला (प्रलंबित) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ 
लाचलुचपत व भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सर्वसामान्य व्यक्तीला एखादे काम पूर्ण करण्यासाठीच्या मोबदल्यात पैसे (लाच) मागतो. त्यासंबंधीची तक्रार ती व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) देते़ तेव्हा एसीबी तक्रारदारासोबत एक पंच पाठवून सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितली किंवा नाही, याबाबत खात्री करतात. त्यानंतर एसीबी सापळा लावून शासकीय अधिकारी व कर्मचारी हे पैसे घेताना त्यास रंगेहाथ पकडतात़ त्यानंतर संबंधित लाचखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो़ मात्र पुढील कार्यवाहीसाठी एसीबी खाते दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी संबंधित लाचखोरांच्या विभागप्रमुखास दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागते़ मात्र संबंधित खाते परवानगी देण्यास विलंब करीत असल्यामुळे लाचखोरांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे़  मात्र एसीबीच्या कामगिरीमुळे अलीकडच्या काळात प्रलंबित प्रकरणे निकाली निघू लागली आहेत़
अभियोग मंजुरी म्हणजे आहे तरी काय?
एखाद्या शासकीय अधिकारी व कर्मचारी हा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला तर त्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो़ त्यानंतर त्यांच्या पुढील चौकशीसाठी दोषारोपपत्र दाखल करावे लागते़ दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी एसीबीची असते़ त्यासाठी एसीबीला संबंधित लाचखोराच्या विभागप्रमुखाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे़ त्यासाठीचे पत्र एसीबी त्या विभागप्रमुखाला देते़ या संपूर्ण प्रक्रियेलाच अभियोगपूर्व मंजुरी असे म्हणतात़ मात्र ही काहीवेळा परवानगी मिळत नसल्याने तपास रखडला जातो़ 
 
एसीबीच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर एक नजर
- राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आॅगस्टअखेर राज्यात ६९१ सापळा कारवाया यशस्वी केल्या़ शिवाय ८ अपसंपदा, १० अन्य भ्रष्ट्राचारांची प्रकरणे समोर आणली़ राज्यात एकूण ७०९ गुन्हे दाखल करण्यात आले़ मात्र दाखल गुन्ह्यापैकी ४३९ प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत़ त्यापैकी ४ प्रकरणे हे शासनाच्या अभियोग पूर्व मंजूरीसाठी तर सक्षम अशा ७६ प्रकरणासाठी प्रलंबित आहेत़ राज्यात आॅगस्टअखेर फक्त ३५ प्रकरणास अभियोग पूर्व मंजूरी प्राप्त झाली आहे़
 
ख़ापर मात्र एसीबीच्या माथी 
बºयाचदा खातेप्रमुखाची परवानगी न मिळाल्याने तपास पूर्ण होत नाही़ पुढे सुनावणीवेळी या त्रुटी आरोपीचे वकील युक्तिवादावेळी मांडतात़ त्यामुळे फक्त गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आणि दुसरीकडे निर्दोष सुटण्याचेही प्रमाण वाढते़ केवळ खातेप्रमुखाची परवानगी न मिळाल्याने़ या साºयाचे खापर पुढे एसीबीवर फोडले जाते़
 
तपासातला अडथळा़
- लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या पुढील तपासासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यात येते़ त्यासाठी त्या लाचखोरांच्या प्रमुखांची पूर्वपरवानगी हवी असते़ त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रितसर कागदपत्रांची पूर्तता देखील केली जाते; पण काही वेळा संबंधित लाचखोराच्या विभागप्रमुखांकडून त्यास विरोधही दर्शविला जातो़ त्यासंबंधीचे कारणही संबंधित विभागप्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे देते़ दोषारोपपत्र सादर करण्याला विरोध केल्यामुळे तपास कामात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.
 
दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी विभागप्रमुखांच्या पूर्वपरवानगीसाठी एसीबी रितसर पाठपुरावा करते़ अभियोगपूर्व मंजुरी मिळत नाही म्हणून तपास रखडला जातो हे खरे असले तरी मात्र याची टक्केवारी फारच कमी आहे़ काही वेळा लाच घेतानाच्या बाबीही अभियोगपूर्व मंजुरी देताना तपासल्या जातात़ 
- अरुण देवकर उपअधीक्षक, एसीबी, सोलापूऱ