शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

एसटी कर्मचाऱ्यांची साडेसाती निवृत्तीनंतरही सुटेना; पेन्शनच्या प्रतीक्षेत 4500 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 8:19 AM

दहा वर्षांत २५०० जणांच्या पत्नीचेही झाले निधन. पेन्शनच्या मुद्यावर कोरोनानंतर महामंडळाच्या मुख्यालयावर कर्मचाऱ्यांच्या विधवांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे गेल्या दहा वर्षांत निवृत झालेले ४६०० कर्मचारी व त्यानंतर त्यांच्या २५०० पत्नी यांचा पेन्शन न मिळताच मृत्यू झाला आहे. काही विधवा महिला आजही पेन्शनसाठी विभागीय कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

श्रीरंग बरगे म्हणाले की, पेन्शनबाबत चालक आणि वाहक व इतर कर्मचारी आणि अधिकारी जागरूक नसतात. सेवानिवृत्तीनंतरच ते जागे होतात. कर्मचारी किंवा अधिकारी एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यास कार्यमुक्ती आदेशासोबत ज्याप्रमाणे लास्ट पेमेंट सर्टिफिकेट दिले जाते, त्याचप्रमाणे पेन्शनसंदर्भातील माहिती सोबत देण्यास आळस केला जातो. कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात किंवा निवृत्त झाल्यानंतर ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होते एखाद्या कर्मचाऱ्यांची पेन्शन कॉन्ट्रिब्युशन अन्य कर्मचाऱ्याच्या नावावर वर्ग झाल्याचेही प्रकार घडले आहेत.

अधिकारी व कर्मचारी जबाबदार : एसटी महामंडळाच्या प्रशासन शाखेत पेन्शनचे कामकाज हाताळणारे कर्मचारी हे वारंवार बदलतात. यामुळेही अडचणी निर्माण होत असतात; पण मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्वच विभागांना कायमस्वरूपी लिखित सूचना केल्या जात नाहीत. विभागीय व मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचारी व अधिकारी यांची माहिती संकलित करून संबंधित पेन्शन ऑफिसमध्ये पाठविली पाहिजे; पण हे काम स्वतः निवृत्त कर्मचारी व अधिकारी फेऱ्या मारून करीत आहेत. पेन्शन न मिळण्यास एसटीमधील संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत सेवानिवृत्तांना न्याय मिळणार नसल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.

कर्मचारी काँग्रेसचा मोर्चाचा इशारापेन्शनच्या मुद्यावर कोरोनानंतर महामंडळाच्या मुख्यालयावर कर्मचाऱ्यांच्या विधवांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :state transportएसटी