शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

४८ लाख टन उसाचे उत्पादन

By admin | Published: January 25, 2016 2:57 AM

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे.पुढील अडीच महिन्यांत शेतातच उभ्या असलेल्या ३२५ लाख टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सर्व कारखान्यांचे मिळून ५५ ते ६० टक्के उसाचे गाळप करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत शेतात ४० ते ४५ टक्के ऊस उभा आहे. या वर्षी पाण्याची कमतरता पाहता, राज्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील ७० कारखान्यांपैकी ९० टक्के साखर कारखाने बंद स्थितीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकाही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. बीडमधील माजलगाव धरणामध्ये गेल्या वर्षापासूनच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील अवघे तीन साखर कारखाने सुरू आहेत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. त्यामुळे कारखानदारांना कारखाने बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन उसाच्या गाळपाचा अंदाज होता. त्यापैकी ५४ लाख ३८ लाख २२९ टनाचे गाळप झाले आहे.सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनांचा केलेला अंदाज पाण्याच्या कमतरतेमुळे ८० लाख टनांवर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अजून २५ लाख टन ऊस शेतात उभा आहे, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)