शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

By admin | Published: October 10, 2016 5:58 AM

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहतुकीबरोबरच एसटीच्या सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला. आंदोलनामुळे मालवाहतुकीचे तब्बल ५0 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली. या घटनेत एसटी बसगाड्यांचीही जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने महामंडळाला ३ कोटींपेक्षा जास्त फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिक आणि परिसरात आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करतानाच जाळपोळही केली. यात मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. महामार्गाजवळच असणाऱ्या गोंदेगाव, वडवली गाव आणि आणखी एका ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. एक सुमो गाडी तर एक दुचाकी वाहन आंदोलनकर्त्यांकडून जाळून रास्ता रोको करण्यात आला. दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्पच होती. मुंबईहून कसारामार्गे नाशिकला जाणारी वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की,मुंबईच्या विविध भागांतून सुमारे ४५ हजारांहून अधिक माल वाहतुक गाड्या या मार्गाने उत्तर आणि पूर्व भारतात जातात. मुंबई-आग्रा द्रूतगती मार्गावरील घोटीनजीक झालेल्या रास्ता रोकोचा सर्वाधिक फटका बसला. बऱ्याच वाहनांच्या काचा फोडून टायर फाडण्यात आले आहेत. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रारही वाहन मालकांनी केली असल्याचे सांगितले. तीव्र आंदोलनामुळे माल वाहतुकीचे एका दिवसात सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. शिवाय आणखी १२ ते २४ तास आंदोलनाचा फटका बसल्यास नुकसानाची आकडेवारी वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाड्यांचे नुकसान मिळून वाहतुकदारांना ५० कोटींहून अधिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे ते म्हणाले. दरम्यान या आंदोलनात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी सात एसटी बस जाळल्या तर नऊ बसची तोडफोड केली. यामुळे महामंडळाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. या मार्गावरुन एसटीच्या ५00 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यावर परिणाम झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जर परिस्थीती अशीच राहिल्यास सोमवारीही मालवाहतुक आणि एसटी सेवांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)