शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

राज्यात ५३ हजार मुली शाळाबाह्य

By admin | Published: January 03, 2015 12:37 AM

गळती घटल्याचा शिक्षण विभागाचा दावा.

अकोला : राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत असून, त्यामुळे शाळांमधून मुलींची गळती घटली असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असला तरी, राज्यात ५३ हजार मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही दूरच आहेत. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून ३ जानेवारी २0१४ पासून लेक शिकवा अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर झाला असून, अनेक मुली शिकू लागल्या आहेत. या अभियानामुळे मुलींच्या शाळा गळतीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. सद्यस्थितीत मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली, तर असे लक्षात येते की, प्राथमिक शिक्षण विभागात मुलींच्या गळतीचे प्रमाण तीन टक्के, तर माध्यमिक शिक्षण विभागात हे प्रमाण सात टक्के आहे. यापूर्वी हे प्रमाण प्राथमिकस्तरावर ८ टक्के तर माध्यमिक स्तरावर १५ टक्के होते. दोन्ही मिळून १३ टक्के गळती कमी करण्यात शिक्षण विभागाला यश आले असल्याचा दावा शिक्षण संचालनालयाने केला आहे. लेक शिकवा अभियानात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोफत गणवेश व पाठय़पुस्तके देण्यात येत आहेत. दिवसाला एक रुपया याप्रमाणे भत्ता देण्यात येतो. परिणामी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत ६५ हजार मुली नियमितपणे शाळेत उपस्थित राहू लागल्या आहेत, असा शिक्षण विभागाचा दावा आहे. असे असले तरी अद्यापही ५३ हजार मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही.राज्यात प्राथमिक व माध्यमिक मिळून मुलींच्या गळतीचे प्रमाण १३ टक्यांनी कमी झाले आहे. ६५ हजार मुली आता नियमितपणे शाळेत उपस्थित राहू लागल्या आहेत. मुलींचे प्रमाण आणखी वाढावे व गळती कमी व्हावी, यासाठी दैनंदिन भत्ता एक रुपयांवरुन पाच रुपये करण्याची मागणी शासनाकडे केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने सांगीतले.