शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

वर्षासहलीसाठी गेलेल्या मुंबईतील ५५ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

By admin | Published: June 27, 2017 3:19 AM

माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

गिरीश गोरेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे विद्यार्थी तेथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्यावर गेले होते. जवळपास दोन तास हे बचावकार्य सुरू होते. मुंबईतील पोदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच. आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्यावर रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले. या ठिकाणी देवकुंड व इतर धबधबे एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार झाला असून, येथूनच कुंडलिका नदी उगम पावते. त्या दोन्ही प्रवाहांत सदर ५५ विद्यार्थी सहलीची मौजमजा घेण्यासाठी आले होते. मात्र, दुपारनंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी धावपळ झाली. याच धावपळीत तानेश चेतन बोरकर (१७ रा. मुंबई), हा विद्यार्थी दोन्ही प्रवाहाच्या पलीकडे वाहत गेल्याने जखमी झाला आणि दुसऱ्या बाजूस अडकला होता.इतर विद्यार्थ्यांना नदी ओलांडून येणे शक्य नव्हते व पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे मनजित ठाकूर याने मोबाइलद्वारे रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तेथील परिस्थिती कळवली. त्यानंतर माणगाव पोलीस ठाणे अंमलदार म्हात्रे यांनी रावळजे दूरक्षेत्र येथे पेट्रोलिंग करत असलेले माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, कर्मचारी अनिल वडते, रमेश बोडके तसेच टेकाडे यांनी विरेंद्र सावंत यांचे, दैव राफ्टिंगचे पथक घेऊन धबधब्याच्या ठिकाणी धाव घेतली. पोलीस आणि राफ्टिंगच्या पथकाच्या मदतीने दोन ते अडीच तास निकराचे प्रयत करून, सर्व विद्यार्थ्यांची सायंकाळी उशिरापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली.