शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

वास्तव! महाराष्ट्रातील ५५ टक्के खेडी इंटरनेटविना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 5:55 AM

देशात ४.५० लाख खेड्यांत नाही ऑप्टिकल फायबर. धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील सहा लाख खेडी आणि पंचायतींना ऑगस्ट २०२१ अखेर ऑप्टिकल फायबरने जोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार होण्याची चिन्हे नाहीत. यावर्षी जुलैपर्यंत ५.९८ लाख खेड्यांपैकी फक्त १.५० लाख ग्रामपंचायती भारत नेट प्रोजेक्टअंतर्गत जोडल्या गेल्या होत्या व ती टक्केवारी आहे सुमारे २५.

धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही. अधिकृत सूत्रांकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात २०१४ खेड्यांत थ्री जी, फोर जी मोबाईल टेलिफोन सेवा नाही आणि ४०,९५९ (५५ टक्के) खेड्यांत इंटरनेट सेवा नाही. इंटरनेट फक्त १९,०१३ खेड्यांत उपलब्ध आहे. सहा लाख खेड्यांपैकी फक्त ३० टक्के खेड्यांत इंटरनेट उपलब्ध आहे आणि अशा खेड्यांत राहणाऱ्या मुलांना विकसित खेड्यांतील मुलांच्या तुलनेत रिमोट एज्युकेशन फॅसिलिटीज नाहीत.

बिहारमधील ३९,०७३ खेड्यांपैकी ८,१६३ खेड्यांत इंटरनेट सेवा आहे. थ्री जी, फोर जी नेटवर्क सुविधेपक्षा ही परिस्थिती खूप चांगली आहे. फक्त ३२१ खेड्यांत फोर जी सेवा नाही. उत्तर प्रदेशमधील ९७,८१३ खेड्यांपैकी ६२० खेड्यांत ही सेवा नाही; पण इंटरनेटचा विचार केला तर उत्तर प्रदेशात अशी सेवा फक्त ३० टक्के आहे.देशात पंजाबमध्ये इंटरनेटची सेवा १०० टक्के आहे. तेथे १२,६६० खेड्यांत इंटरनेटची पूर्ण सेवा आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत या खेड्यांची संख्या १२,१६८ होती. 

हरयाणात इंटरनेची सेवा ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपलब्ध आहे. थ्री जी, फोर जी सेवा राज्यातील १०० टक्के खेड्यांत उपलब्ध आहे. केरळमध्ये इंटरनेटची सेवा ९५ टक्के खेड्यांत आहे.

आता ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान मोदी यांनी आता हे लक्ष्य गाठण्यासाठी ऑगस्ट २०२३ निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडला अपयश आल्यामुळे मोदी यांनी खासगी सेवादारांकडून निविदा मागवून पीपीपी मॉडेलचा आधार घेतला आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र