शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मराठवाड्याला विजेसाठी ५६० कोटी

By admin | Published: March 05, 2016 4:06 AM

बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले

लातूर : बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले. कोकणातून चारा आणून विभागीय आयुक्तांमार्फत चारा डेपो सुरु करणार असून उजनी-उस्मानाबादची योजना १६ एमएलडी करण्याच्या १३.४४ कोटीच्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. लातूरला टंचाईसाठी १५ कोटीसह तब्बल सात वेळा मंजूर होऊन न झालेल्या भंडारवाडीच्या ३७ कोटीच्या प्रस्तावाला पुन्हा मंजुरी इतकेच काय ते लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे फलित. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा छावण्यांसाठी आणखी ५० कोटी वाढविल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे दर जुन्या डीएसआरने १८१ रुपयेअसून ते देखील वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर आणि डुबकी घेण्यासाठी घालून दिलेल्या आर्थिक निकषांच्या मर्यादा दुप्पट केल्या आहेत. गावातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील आणि केशरीमधून हुकलेल्या शेतमजुरांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गव्हू योजनेत विनाशर्त सामावून घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात १७९९ टँकर सुरु असून त्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्याच्या पेरणी हंगामासाठी कृषी विभाग जे बियाणं पुरवितं त्यात दुप्पट वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शैक्षणिक फी माफीचा विस्तार आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांकडे दिला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. > मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी काही द्यायला आलो नाही तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, हे पहायला आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा अक्षरश: भ्रमनिरास केला. सरकारने केलेल्या कर्तबगारीचे दाखले देत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. आत्महत्या करू नका,’ असे आवाहन करून कोरडा दिलासा दिला.