शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या

By नरेश डोंगरे | Updated: March 13, 2025 20:59 IST

Holi Special Trains News: देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत.

-नरेश डोंगरे, नागपूरप्रचंड उत्साह आणि सणांचा गोडवा घेऊन येणाऱ्या होळी तसेच धुलीवंदनाचे सण आपल्या गावी, आपल्या आप्तांत जाऊन साजरा करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. मध्य रेल्वेने होळीसाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचे नियोजन केले आहे. देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

होळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. हा सण आपल्या गावात जाऊन आपल्या प्रियजणांसोबत साजरा करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे होळी सणाच्या वेळी अचानक प्रवाशांची सर्वत्र प्रचंड गर्दी वाढते. 

एकाच वेळी गर्दी वाढल्याने अनेक प्रवाशांना रेल्वे गाड्यांमध्ये जागाच मिळत नाही. मिळेल त्या जागेवर प्रवासी बसत असल्याने कन्फर्म तिकिट काढून बसलेल्या प्रवाशांसह सर्वांनाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे अनेक जण ऐनवेळी आपल्या गावाला जाण्याचे नियोजन रद्द करतात. त्यामुळे त्यांच्या सणाच्या आनंदावर काहीसे विरजण पडल्यासारखे होते. 

हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रवाशांना त्यांच्या गावात जाऊन सण साजरा करता यावा म्हणून मध्य रेल्वेने देशभरात १८४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ६२ गाड्या महाराष्ट्रातील विविध भागात धावणार आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल कोचही राहणार आहेत. या गाड्या आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही स्वरूपात राहणार आहेत.

नागपूर-विदर्भासाठी धावणाऱ्या गाड्या

६२ गाड्यांमध्ये नागपूर विदर्भात १६ गाड्या धावणार आहेत. त्यात मुंबई नागपूर या स्पेशल ट्रेनच्या ८ तसेच पुणे नागपूर स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्यांचाही समावेश आहे. ठिकठिकाणी राहणाऱ्या नागपूर विदर्भातील प्रवाशांना त्याचा चांगला लाभ मिळणार आहे.

गर्दीचे रेल्वेकडून नियोजन

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रमुख स्थानकांवर पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालय सुविधा असलेली होल्डिंग एरिया तयार केला आहे. विशेष गाड्यांमध्ये सुरळीत चढण्यासाठी अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करून गर्दी टाळण्यासाठी रांगेची व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेवरही लक्ष

रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये झालेल्या गर्दीचा फायदा उठवून गुन्हेगारांनी संधी साधू नये यासाठी सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. त्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष नजर राहणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेHoliहोळी 2025MumbaiमुंबईPuneपुणे