शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

७ कि.मी.चा रस्ता; ७ वर्षांत ७५० अपघात--फटका--समस्यांचा महामार्ग

By admin | Published: January 11, 2016 1:06 AM

टोप ते तावडे हॉटेल महामार्ग : दिवसाला सरासरी तीन अपघात; रस्ते कामातील त्रुटींचा वाहनधारकांना

सतीश पाटील --शिरोली -सुरक्षित आणि जलद वाहतुकीसाठी बारा वर्षांपूर्वी अद्ययावत आणि विस्तृत असा चौपदरी महामार्ग तयार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघाताचे प्रमाण घटेल, दळणवळणाचा वेग वाढेल असे वाटत होते. पण, काही अपुरी कामे आणि दुरुस्तीच्या दुर्लक्षामुळे कागल ते सातारा हा १३३ किलोमीटर लांबीचा महामार्ग जणू मृत्यूमार्गच बनला आहे.टोप ते तावडे हॉटेल या सात किलोमीटरमधील रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या सात किलोमीटर अंतरात सात वर्षांत तब्बल ७५० अपघात झाले आहेत. या ठिकाणी सरासरी दिवसाला तीन अपघात होतात. या ठिकाणी आतापर्यंत तब्बल ३५५जण गंभीर जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर १५३ जणांना प्राण गमवावे लागले. कागल-सातारा रस्त्याचे चौपदरीकरण २००६ मध्ये पूर्ण होऊन वाहतुकीस महामार्ग खुला झाला. पण, कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराचे चौपदरीकरण करताना काही ठिकाणी कामात चालढकल झाल्याचे दिसते. त्यामुळे दुपदरी महामार्ग असताना जेथे अपघात क्षेत्र होते ते आजही तशीच आहेत. त्यात प्रामुख्याने टोप, शिये फाटा, नागांव फाटा, सांगली फाटा, तावडे हॉटेल ही ठिकाणे येतात.चौपदरीकरणावेळी राहिल्या त्रुटी आणि दररोज ढासळणारा दर्जा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर टोप, नागांव फाटा, सांगली फाटा, अंबप फाटा येथे उड्डाणपुलाची गरज आजही आहे. याठिकाणी उड्डाणपूल उभारले असते तर अपघातांचे प्रमाण घटले असते. सध्या सहापदरी महामार्ग करण्याच्या दृष्टीने कागल, किणी, आणि तासवडे याठिकाणी तीन संगणक संच बसवून या मार्गावरील वाहनांची संख्या मोजण्याचे काम सुरू आहे. यात चारचाकी, दुचाकी, तीनचाकी, मोठी अवजड वाहने, बैलगाडी, सायकल अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. यावेळी तरी शासनाने कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराच्या रस्त्याचा सर्व्हे करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि मगच सहापदरीचे काम सुरू करावे. यावेळी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. भविष्यात महामार्गावरील वाहतूक वाढणार असून, अपघाताचा धोका वाढणार आहे. ( क्रमश:)कागल सातारा सहापदरीचे काम करीत असताना टोप येथे गावच्यावतीने उड्डाणपुलाची मागणी केली आहे. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार आहे, वाहने वेगाने येत असल्यामुळे दररोजचा अपघात ठरलेला असतो. उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामहामार्गाच्या पुणे कार्यालयात जाऊन मागणी केली आहे. उड्डाणपूल झाला नाही तर नियोजित रस्त्याचे काम होऊ देणार नाही. - धनश्री दौलत पाटील,सरपंच, टोप सांगली फाटा हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. नागांव फाटा ते सांगली फाट्यापर्यंत उड्डाणपूल होणे आवश्यक आहे, त्यामुळे नागाव फाटा ते सांगली फाट्यापर्यंतचे अपघात कमी होतील. सांगली फाटा येथे कोल्हापूर-सांगली, पुणे-बंगलोर महामार्ग हे दोन्ही एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते म्हणूनच या ठिकाणी उड्डाणपूलाची गरजच आहे. -बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली टोप ते तावडे हॉटेल रस्त्यावरील अपघातवर्षअपघात मयतजखमी२००९०९८१९५२२०१०१३१४०९७२०१११२१२६५३२०१२१२६२२५८२०१३०६११७४८२०१४१०७१८८३२०१५०६०११४७एकूण७०४१५३४३८जवळच नजर लागावी असा रस्ताकोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही. कागलपासून हाकेच्या अंतरावर कर्नाटकातील महामार्ग नजर लागावी असा आहे. येथील सुविधा आणि प्रशस्त रस्ते पाहिल्यावर आपल्याकडील कामाची कीव येते. निदान सहापदरीच्या कामावेळी तरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चांगले काम करून घ्यावे अशी वाहतूकदार, प्रवाशांची अपेक्षा आहे. एक दृष्टीक्षेप750--अपघात355--गंभीर जखमी 153--बळी