शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

८ लाख २० हजार मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Published: April 03, 2016 3:52 AM

अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून २०१५-१६ या शैक्षणिक

- यदु जोशी,  मुंबई

अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील ८ लाख २० हजार म्हणजे ४९ टक्के विद्यार्थी वंचित राहिले आहेत.या वर्षात १६ लाख ७४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ८ लाख ५४ हजार ३९२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ८ लाख २० हजार ३७३ विद्यार्थ्यांना मिळाली नाही. निधीची कमतरता आणि विभागाच्या अधिकाऱ्यांमधील नियोजनाचा अभाव अशी दोन्ही कारणे त्यासाठी सांगितली जात आहेत. आधीच्या वर्षांतील प्रलंबित शिष्यवृत्तीपोटी ६ लाख ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांना ९४२ कोटी रुपये वाटण्यात आले. विविध महसूल विभागांचा विचार केला तर सर्वाधिक ७१ टक्के वाटप लातूर विभागाने तर सर्वांत कमी ४० टक्के वाटप हे नागपूर विभागाने केले. अमरावती - ५८ टक्के, औरंगाबाद - ५२ टक्के, मुंबई - ५८ टक्के, नाशिक - ६० टक्के आणि पुणे - ४३ टक्के असे अन्य प्रमाण आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ई-स्कॉलरशिप वेबसाईटवरून शनिवारी ही आकडेवारी उपलब्ध झाली.या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी मात्र इतकी प्रकरणे प्रलंबित असल्याचा इन्कार केला. सुमारे साडेतीन ते चार लाख प्रकरणे प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. विशेषत: ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी केंद्र सरकारकडून मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील टक्केवारी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात 2015-16या शैक्षणिक वर्षातील १ लाख ५८ हजार १९२ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५१ हजार ७१७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले. केवळ ३२ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ झाला.दुष्काळग्रस्त बीडमध्ये वाटप ५१ टक्केच : बीड या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्क्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ झाला. हिंगोली व लातूरमध्ये वाटपाची टक्केवारी ७० आणि ७१ अशी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे ८० टक्के वाटप झाले.बडोलेंच्या जिल्ह्यातून शिष्यवृत्तीचा पैसा परतसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे ज्या जिल्ह्यातून निवडून येतात आणि जिथे पालकमंंत्री आहेत तेथील ४९ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली. चालू वर्षी ३५ हजार ६८० विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ६७३ विद्यार्थ्यांच्या पदरी शिष्यवृत्ती पडली; तर ३ कोटी ८७ लाख रुपये परत गेले. ३० टक्के कपातीचा सामाजिक अन्यायसामाजिक न्याय विभागासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या तरतुदीला ३० टक्के कट लावण्यात आल्याची माहिती आहे. हा अन्याय असल्याचा नाराजीचा सूर आहे.शिष्यवृत्ती वाटपावर सामाजिक न्याय विभागाने २ हजार ५९० कोटी रुपये खर्च केले. त्यात आधीच्या वर्षांतील ६ लाख ३ हजार २२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यावर खर्च झालेल्या ९४८ कोटी रुपयांचा समावेश आहे. गेली काही वर्षे नियमित वाटप झाले असते तर आजची वेळ आली नसती. - राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री