ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - पवई तलावात बोट उलटली असून आठ जण पाण्यात बुडाले आहेत. यापैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं असून, तिघेजण पोहत किना-यावर पोहोचले. मात्र तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. पार्टी करण्यासाठी जात असताना रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
बुडालेली बोट हाऊस बोट असल्याचं समोर आलं आहे. एका रॉडला अडकून बोट पलटी झाल्याचा अंदाज व्यक्त केला येत आहे. हाऊसबोटीवर पवई तलावात कायदेशीर बंदी असतानाही ही बोट कशी काय वापरली जात होती, याचा शोध सुरु आहे. तसंच या पार्टीला परवानगी कोणी दिली याचीही चौकशी सुरु आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.