शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मालवणच्या समुद्रात ८ जण बुडाले

By admin | Published: April 16, 2017 4:47 AM

मालवणच्या तेली पाणंद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले सात महाविद्यालयीन विद्यार्थी व एक प्राध्यापक असे आठ जण शनिवारी बुडून मरण पावले.

सिंधुदुर्ग : मालवणच्या तेली पाणंद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले सात महाविद्यालयीन विद्यार्थी व एक प्राध्यापक असे आठ जण शनिवारी बुडून मरण पावले. समुद्रात भरती असल्याने ही दुर्घटना घडली. ते बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. दुर्घटनेतून तिघांना वाचविण्यात यश आले. दोन प्राध्यापकांसह हे ४७ विद्यार्थी कोकण दर्शन सहलीसाठी निघाले. पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पाला व महाबळेश्वरला भेट देऊन ते शनिवारी मालवणला आले. सिंधुदुर्ग किल्ला पाहून ते वायरी किनाऱ्यावर आले. भरतीमुळे स्थानिकांनी पाण्यात न जाण्याच्या सूचना केल्या. तरीही सर्व ४७ जण समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ११ जण बुडू लागले. सहकाऱ्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक मच्छीमार व स्कूबा ड्रायव्हरनी त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचे नातेवाईक सायंकाळी उशिरा येथे आले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन यंत्रणा ‘फेल’- स्थानिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटकांना समुद्राबाहेर काढले. मात्र, रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. - ‘किनाऱ्यावर जीवरक्षक नेमले खरे, पण त्यांना लागणाऱ्या आवश्यक साहित्याची पूर्तता झाली नाही, मग धोकादायक स्थितीत पर्यटकांचे जीव वाचवायचे कसे,’ असा सवालही त्यांनी केला. - सहलीसाठी महाविद्यालयाकडून परवानगी घेतली नव्हती. विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक परस्पर मालवणला गेल्याचा खुलासा इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य उडुपी यांनी केला. मृतांची नावे...प्राध्यापक महेश कुडुचकर (वय ३५) तसेच नितीन मुनतवाडकर (२२), मुजमिल हन्नीकेरी (२२), किरण खांडेकर (२२), अवधूत ताशीलदार (२२), माया कोल्हे (२२), करुणा बेर्डे (२१) आणि आरती चव्हाण (२२)- मच्छीमार व स्कूबा डायव्हर यांच्या मदतीमुळे संकेत गाडवी (२३), अनिता हानळी (२२), आकांक्षा घाटगे (२२) यांना वाचविण्यात आले. आकांक्षाची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.