शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Published: July 04, 2017 9:44 AM

मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4- राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. तसंच प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबतची सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मेट्रोसिटी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत आहे. मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत  मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. यामध्ये मुंबई शहरातील 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत दीड लाखापर्यंत कर्ज असलेले शेतकरी आणि सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहेत, अशा शेतकऱ्यांचीही आकडेवारी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 
 
राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक यात लागला आहे. यवतमाळमधील २ लाख ४२ हजार ४७१ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच २३ हजार ५०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
 
दरम्यान, कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. म्हणुनच मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे, असं बोललं जातं आहे. 
 
इतक्या शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
 
अहमदनगर – 2 लाख 869
औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322
बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818
गडचिरोली – 29 हजार 128
जळगाव – 1 लाख 94 हजार 320
लातूर – 80 हजार 473
नागपूर – 84 हजार 645
नाशिक – 1 लाख 36 हजार 569
परभणी – 1 लाख 63 हजार 760
रत्नागिरी – 41 हजार 261
सिंधुदुर्ग – 24 हजार 447
वाशिम – 45 हजार 417
अकोला – 1 लाख 11 हजार 625
बीड – 2 लाख 8 हजार 480
चंद्रपूर – 99 हजार 742
गोंदिया – 68 हजार 290
जालना – 1 लाख 96 हजार 463
मुंबई शहर – 694
मुंबई उपनगर – 119
नांदेड – 1 लाख 56 हजार 849
उस्मानाबाद – 74 हजार 420
पुणे – 1 लाख 83 हजार 209
सांगली – 89 हजार 575
सोलापूर – 1 लाख 8 हजार 533
यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471
अमरावती – 1 लाख 72 हजार 760
भंडारा – 42 हजार 872
धुळे – 75 हजार 174
हिंगोली – 55 हजार 165
कोल्हापूर – 80 हजार 944
नंदूरबार – 33 हजार 556
पालघर – 918
रायगड – 10 हजार 809
सातारा – 76 हजार 18
ठाणे – 23 हजार 505