शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

अकरावीसाठी ८८ हजार जागा

By admin | Published: August 06, 2016 1:22 AM

अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली

मुंबई : अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या किमान ८८ हजार जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना केले होते. त्यानंतर ८ व ९ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरायचे आहेत. शिवाय अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालये निवडणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. याआधीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेप्रमाणे विशेष फेरीत महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांची नावे देण्याची संधी मिळणार आहे. सहाव्या गुणवत्ता यादीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकूण ९७ हजार ६०९ जागा रिक्त होत्या. त्यात कला शाखेच्या १८,५३६ वाणिज्यच्या ५३,५१५ आणि विज्ञान शाखेच्या २५,५५८ रिक्त जागांचा समावेश होता. मात्र सहाव्या गुणवत्ता यादीत एकूण ९, ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांतील ९,६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८७,९६४ जागा रिक्त राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवाय १०० टक्के विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने रिक्त जागांचा आकडा ९० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवाचदूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखाबदल करायचा आहे, विषयबदल करायचा आहे, असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीसाठी अर्ज करू शकतात.विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे.शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करण्यास सुरुवात झाली आहे.नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.विशेष फेरीसाठी किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची निवड करणे बंधनकारक आहे.महाविद्यालयांची निवड करताना संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा आणि कट आॅफ पाहूनच निवड करावी.कोणत्याही क्षेत्र किंवा वॉर्डमधील महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.याआधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून घेतलेला प्रवेश विशेष फेरीसाठी अर्ज करताना रद्द करण्याची गरज नाही.>उपलब्ध जागांची संख्या शाखारिक्त जागाकला१८ हजार ५३६वाणिज्य५३ हजार ५१५विज्ञान२५ हजार ५५८एकूण९७ हजार ६०९

 

अर्धवट अर्ज भरल्याने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार आहे.मात्र या विद्यार्थ्यांना शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि महानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.