शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

सिंचनासाठी ९२०० कोटी

By admin | Published: May 04, 2016 4:43 AM

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र

मुंबई : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील १३२ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार २०० कोटी रुपये तर अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७ हजार २०० कोटी रुपये मिळणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. एकूण १३२ सिंचन प्रकल्पांपैकी ९८ विदर्भातील आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ९८ कोटी रुपयांची गरज असून ते पूर्ण झाल्यानंतर १ लाख ४० हजार ६११ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मराठवाड्यातील ३४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार १८७ कोटी रुपये लागणार असून ते पूर्ण झाल्यानंतर २ लाख १८ हजार ७०१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंर्तगत देशातील ८९ विशेष सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. यातून देशात साधारण ८० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. महाराष्ट्रातील २६ विशेष सिंचन प्रकल्पांचा यात समावेश आहे. यातून राज्यात अंदाजे २० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या प्रकल्पांची एकूण किंमत साधारण ३८ हजार कोटी रु पये इतकी आहे. भूसंपादनामुळे या प्रकल्पांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यांना वाढीव किंमतीनुसार मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. ती उमा भारती यांनी मान्य केली. तसेच महाराष्ट्रातील कोणत्या सिंचन प्रकल्पाला किती निधीची गरज आहे, याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, केंद्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे विशेष सचिव अमरजित सिंह, राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)तापी मेगाचा डीपीआर : तापी मेगा रिचार्जमुळे उत्तर महाराष्ट्रातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर सादर करण्यात यावा, असे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. तसेच दमणगंगा पिंजाळ प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पामुळे मुंबईच्या २०६० पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गोसीखुर्दसाठी समितीगोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाचा या वेळी आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प येत्या ३ वर्षांत पूर्ण करावयाचा असल्याचे सांगितले. त्यासाठी जलसंपदा विभागाचे केंद्रीय विशेष सचिव अमरजित सिंह यांची एक समिती नियुक्त करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. गोसीखुर्दसाठी केंद्र सरकारकडून ९० टक्के आणि राज्याकडून १० टक्के यानुसार निधी देण्यात येईल, असे उमा भारती यांनी सांगितले. यांना होणार फायदाविदर्भ (प्रकल्प संख्या) : अमरावती २६, अकोला १२, वाशिम २९, यवतमाळ १६, बुलडाणा १०, वर्धा ५. एकूण ९८. मराठवाडा : औरंगाबाद ७, जालना ४, परभणी १, हिंगोली १, नांदेड ५, बीड २, लातूर १०, उस्मानाबाद ४