शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:59 IST

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे.

ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दहशतवादी कारवायांमुळे मुंब्रा हे देशभरातील तपास यंत्रणांच्या रडारवर होते. मात्र, यापुढे भिवंडीचेही नाव त्या यादीत जोडले गेले आहे.सिम बॉक्सच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स राउट करून संबंधित व्यक्तीला जोडणा-या अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी जवळपास १५ दिवस या प्रकरणाची तांत्रिक माहिती मिळवली. त्यानंतर, मंगळवारी एकाच वेळी भिवंडीत ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यासाठी १० अधिकारी आणि ८० पोलीस कर्मचाºयांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या कारवाईमध्ये ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ३० आरोपींवर पोलिसांना संशय आहे. ९ पैकी ८ आरोपी पाचवी ते बारावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे २१ लाख ६१ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.नियाज अहमद मोहम्मद इब्राहिम शेख, मोहम्मद शाकीर इर्शाद अहमद मोमीन, नदीम अली शेर अली शेख, मोहम्मद उमर अजिजुर्रहेमान खान, मोहम्मद अर्शद मुमताज अहमद शेख, मोहम्मद फुजैल एजाज अहमद शेख, शमशाद अहमद इसामुद्दीन अन्सारी, फक्रेआलम मोहम्मद शाहजहान शेख आणि मोहम्मद आलिम बद्रिजमा शेख ही आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी भिवंडी येथे राहणारे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. या धंद्यातून त्यांना महिनाकाठी प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमध्ये जगजितसिंग गरेवाल आणि मोहन भानुशाली या खासगी तंत्रज्ञांची मोठी मदत झाली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.भिवंडी येथे मे २०१७ मध्ये अशाच प्रकारची कारवाई पोलिसांनी केली होती. त्या वेळी २२ सिम बॉक्सेस आणि ४२० सिम कार्ड्स जप्त करण्यात आली होती.अनधिकृत एक्स्चेंजचे जाळे देशभरात पसरले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. भिवंडीमध्ये सुरू असलेला गोरखधंदा हिमनगाचे केवळ टोक आहे. देशभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये हा उद्योग सुरू असून, त्याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.महसूलचे नुकसान-परदेशातून आलेल्या कॉल्सवर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. या कॉल्सची नोंद संबंधित मोबाइल कंपनीसह दूरसंचार यंत्रणेकडेही होत असते. परदेशातील कॉल्स भारतात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय ‘गेट-वे’ असतो. त्यापोटी विशिष्ट कर भरावा लागतो.अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमार्फत राउट झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची कुठेही नोंद तर होतच नाही, शिवाय त्यामुळे महसूलचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.दूरसंचार यंत्रणेकडे नोंदच नाही-या कारवाईत २५ सिम बॉक्स जप्त केले. त्यामध्ये रिलायन्स, एअरटेल, बीएसएनएल, टेलिनॉर आणि आयडियाचे ४३८ सिम कार्ड्स होते.या सिम बॉक्सेसला राउटरमार्फत इंटरनेटजोडणी दिली होती. या यंत्रणेच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स विनापरवाना राउट करून संबंधित व्यक्तीच्या मोबाइल फोन किंवा लँडलाइन फोनला जोडले जातात.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकTerrorismदहशतवादIqbal Kaskarइक्बाल कासकर