शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अहिरांचा प्रवेश; आदित्य ठाकरेंच ठरलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:20 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप-शिवसेनेने पुन्हा फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र अहिर यांचा प्रवेश म्हणजे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभेत वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. तर सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर या मतदारसंघात आता राष्ट्रवादीकडे सक्षम असा उमेदवार राहिला नाही. त्यामुळे अहिरांचा प्रवेश आणि आदित्य ठाकरेंच निवडणूक लढवण्याचे ठरलं, अशी चर्चा सुरु आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य यांनी वरळी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघातील युवासेनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावून मतदारसंघातील माहिती घेतली होती. त्यानंतर आदित्य हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असल्याचे सुद्धा बोलले जात होते.

मात्र, वरळी हा सचिन अहिर यांचा मतदारसंघ असून, तिथे अहिर यांची पकड मजबूत आहे. हे पाहता आदित्य यांना वरळीमधून  सहज विजय मिळवणे कठीण होते. त्यामुळे थेट सचिन अहिर यांनाच सेनेत घेऊन शिवसनेने राजकीय खेळी खेळली आहे. तर आदित्य यांचा वरळीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना सत्तेत आल्यास आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.