शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Aaditya Thackeray : "देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 10:46 IST

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भारत जोडो न्याय यात्रा रविवारी मुंबईत पोहोचली आणि त्यानंतर शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश दिला. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सध्या आपला देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात सापडला आहे. धमक्या, भ्रष्टाचार आणि चुकीच्या माहितीच्या सहाय्याने ही राजवट फोफावली आहे. पण हे आता चालणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोपासह INDIA आघाडीने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. हे ठिकाण ऐतिहासिक आणि नावाजलेलं आहेच, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, हे स्थळ अखंड प्रेरणा आणि उर्जेचा धगधगता स्रोत आहे."

"सध्या आपला देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात सापडला आहे. धमक्या, भ्रष्टाचार आणि चुकीच्या माहितीच्या सहाय्याने ही राजवट फोफावली आहे. ही राजवट म्हणजे देशाचा कारभार कसा चालवला जाऊ नये, ह्याचा वस्तूपाठच आहे! बेरोजगारी, महागाई, अस्थिरता, धार्मिक फूट आणि हेतुपुरस्सर द्वेष पसरवून ही राजवट राज्य करू पाहतेय. पण हे आता चालणार नाही! आम्ही इथे फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नाही तर ही हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत."

"आपल्या लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी INDIA आघाडी कटीबद्ध आहे, कारण या देशातली सारी जनताच आमची ताकद आहे. देशाने दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली, पण देशाला प्रगतीपथावर नेण्यापेक्षा ह्या राजवटीने देशाला कित्येक दशकं मागे नेलं.... पण आता हीच वेळ आहे राष्ट्राने एकत्र येण्याची, साऱ्या जनतेने INDIA आघाडीसोबत ठाम उभं राहण्याची आणि देशाला उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याची!" असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राPoliticsराजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४