शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:51 IST

अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे.

जालना : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. दरम्यान, या बैठकीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, यासह मराठा आरक्षणासच्या मागणीबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. याशिवाय, शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरती चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते म्हणाले की, आज मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले, नुकसान झालेले आहे. सरकारकडे आता केवळ ६० दिवस उरले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मनोज जरांगे पाटील यांची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट बैठकीत मांडणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणFarmerशेतकरीJalanaजालना