शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

गणेशोत्सव मंडळांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Published: September 23, 2015 1:40 AM

उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सार्वजनिक रीतसर परवानगी घेऊन उत्सव साजरा करतील, ही अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी फोल ठरवली आहे. ठाण्यात ३६० मंडळांपैकी केवळ

ठाणे : उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सार्वजनिक रीतसर परवानगी घेऊन उत्सव साजरा करतील, ही अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी फोल ठरवली आहे. ठाण्यात ३६० मंडळांपैकी केवळ २१४ मंडळांनी पालिकेची रीतसर परवानगी घेऊन मंडप टाकले आहेत. परंतु यातील ४० पेक्षा अधिक मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहितीही समोर आली आहे. तर महापालिका हद्दीतील ६६ मंडळांनी पालिकेची परवानगी न घेता मंडप उभारल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार आता महापालिकेने या ६६ मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. परवानगी न घेता मंडप उभारल्याबद्दल या मंडळांना नोटिसा बजावून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या नव्या धोरणाला बाजूला सारून वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे मंडप उभारले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावाचा दाखला दिला आहे. त्यानुसार बहुसंख्य मंडळांनी आपल्या स्तरावर परंपरागत पद्धतीनेच मंडप उभारले आहेत. यापूर्वी महापालिकेने केलेल्या ठरावानुसार वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, अशाप्रकारे मंडप उभारणीला परवानगी दिली आहे. त्याच आधारे सर्व मंडळांनी आपले मंडप यंदाही उभारले आहेत. मात्र त्याचवेळी न्यायालयाचा दट्ट्या बसण्याची भीती असल्याने सर्वच शासकीय यंत्रणा किमान कागदावरील कारवाईत मात्र आघाडीवर आहेत. ठाण्यातील रस्ते अडविणाऱ्या मंडपांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे तहसीलदारांना दिले होते. तसेच असे तो न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर ठाणे तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालात ६६ मंडळांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी मंडपाच्या विषयावरून नवी मुंबईतील एका मंडळाला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला. त्याच धर्तीवर ठाण्यात कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.