शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
4
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
5
Stock Market Today: ३२० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, मेटल आणि फार्मा सेक्टरमध्ये तेजी; IT स्टॉक्स आपटले
6
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
7
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
8
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
10
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
11
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
12
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
13
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
14
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
15
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
17
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
18
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
19
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
20
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे

"CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी..."; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका

By प्रविण मरगळे | Updated: March 21, 2025 17:48 IST

मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्‍यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - राज्यात घडणाऱ्या घडामोडी आणि त्यातून निर्माण होणारे वाद यावर बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. सरकारमधील कुणीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न करतंय का हे शोधले पाहिजे असं विधान त्यांनी केले आहे. 

नागपूर हिंसावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलतायेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्‍यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांना काही रिपोर्ट येतात का हा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय कदाचित जे पेटवा पेटवी करतायेत. मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्‍यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत. आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनंतर ते बोलले. महाराष्ट्राचा मणिपूर करायचा. पेटवत ठेवायचे हा भाजपाचा प्रयत्न असेल. जे काही थोडे फार उद्योग महाराष्ट्रात येतायेत ती गुजरातला पाठवायची. शासन नसते, प्रशासन त्यांच्या हाती लागत नाही अशा राज्यात दंगली घडवायच्या आणि लोकांना त्यात व्यस्त ठेवायचं हे भाजपाचं काम असते. मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्‍यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टिकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का याचा विचार केला पाहिजे असा आदित्य ठाकरेंनी दावा केला.

दरम्यान, बेरोजगारी, महागाई मुद्दा आहे. पाण्याची समस्या आहे. परंतु कुठेही सरकारला चटका बसू नये त्यासाठी ३५० वर्षापूर्वी घडलं त्यावर वाद काढायचा. केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार आहे, हिंमत असेल तर ती कबर काढा. युवकांना भडकावून दंगल घडवली जाते. नागपूर हिंसाचार घडत असताना मुख्यमंत्री कार्यालय, गृह खाते कुठे होते. सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडवायची हे किती योग्य आहे. जे जे मंत्री पेटवा पेटवी करतायेत. उपमुख्यमंत्री स्वत: जे २ वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून राहिले. कळत काही नाही, येत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मतांचं राजकारण आहेच परंतु त्यांना महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय असा आरोप आदित्य यांनी महायुती सरकारवर केला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा