शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

इभ्रतीपुढे उतारवयातील परवड फिकी! मुलानं घरातून हाकलून दिलं तरी वयोवृद्धांकडून जिव्हाळा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 02:43 IST

ज्येष्ठ नागरिक आणि पालन पोषण व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ हा नवा कायदा शासनाने केवळ वयोवृद्धांच्या हालअपेष्टा डोळ्यांसमोर ठेवून पारित केला आहे.

दत्ता यादव सातारा : बदलत्या जीवनशैलीत वृद्ध आई-वडील तरुण पिढीला आता नकोसे होऊ लागले आहेत. त्यामुळे असे अनेक वृद्ध लोक नाईलाजानं आश्रमात राहत आहेत, तर काही जण बेघर झाल्याचे पाहायला मिळते. या पाठीमागचे एकमेव कारण म्हणजे इभ्रतीचा विचार करून वृद्ध आई-वडील मुलांकडून होणारा छळ गपगुमान सहन करताहेत. हे विदारक चित्र निवारा केंद्र अन् पोलीस ठाण्यातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

अलीकडे वयोवृद्धांची केवळ कौटुंबिक कारणांमुळेच जास्त फरपट होते. मात्र, चार भिंतीआड सुरू असलेली घुसमट नेमकी कोणत्या मार्गाने बाहेर काढावी, हे अनेक वृद्धांना माहिती नसते. त्यामुळे काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तर काही जण कायमचे घर सोडण्यात धन्यता मानतात; परंतु ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, अशा लोकांना कुटुंबाची इभ्रत महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्या मुलाच्या विरोधात बंड करण्यास असे वृद्ध धजावत नाहीत. शरीर साथ देत नसल्याने आता आपलं आयुष्य संपलं, अशी धारणा वयोवृद्धांच्या मनात घर करते.

आयुष्यभर इमानेइतबारे काम करून समाजात प्रतिष्ठा मिळविलेली असते. अशा वेळी उतारवयात आधारवड ठरणाऱ्या मुलाकडूनच जेव्हा बापाला घरातून हाकलून दिले जाते, तेव्हा बापाच्या डोळ्यांसमोर केवळ मरण दिसते.आमच्या निवारा केंद्रामध्ये दाखल असलेल्या बºयाच वृद्धांना नातेवाईक आहेत. अनेकजण चौकशीसाठी येतात तर काहीजण आई-वडिलांना जबरदस्तीने निवारा केंद्रामध्ये पाठविण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून मन हेलावून जातंय. निवारा केंद्रात राहू; पण मुलाविरोधात तक्रार नको, अशी आईवडिलांची धारणा असते. - रवी बोडके, यशोधन निवारा केंद्र, वाईवयोवृद्धेचा समाजासाठी अनोखा संदेशकोरेगाव तालुक्यातील नागुबाई गुजरे (वय ७०) यांना एक मुलगा व दोन विवाहित मुली. त्यांच्या एकुलत्या एक मुलानं त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली. आईला त्यानं घरातून हाकलून दिलं. कोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित मुलावर आईची जबाबदारी नाकारल्यामुळे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पुरावे गोळा करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपही पत्र दाखल केले. नागुबाई गुजरे यांनी समाजासाठी अनोखा संदेश दिला आहे. ‘‘माझ्यासारख्या अनेक आई आणि बापांना घरातून हाकलून दिलं जातंय. त्यांचेच मी प्रतिनिधित्व केले असून, यातून एका तरी मुलाने धडा घेतला तरी मी माझ्या मुलाविरोधात तक्रार दिल्याचे मला समाधान लाभेल,’’ असे गुजरे यांनी तपासी अधिकाऱ्यांना सांगितलंय.

आई-वडील काय विचार करतात...

  • आपले नातेवाईक नावे ठेवतील
  • मुलाच्या विरोधात तक्रार दिली तर पुन्हा तो सांभाळेल का?
  • पोलीस तक्रार घेतील का?
  • समाजात नाचक्की होईल
  • उतारवयात परवड सोसणार नाही
  • पोलीस ठाणे, न्यायालयाचे खेटे घालणार कोण?

 

काय करायला हवं...

  • कायद्याची जनजागृती होणे गरजेचे
  • पोलीस ठाण्यात वृद्धांच्या समस्यांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याची गरज
  • वृद्धांसाठी काम करणाºया सामाजिक संस्थांना शासनाकडून पाठबळ मिळावे

ज्येष्ठ नागरिक आणि पालन पोषण व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ हा नवा कायदा शासनाने केवळ वयोवृद्धांच्या हालअपेष्टा डोळ्यांसमोर ठेवून पारित केला आहे.

या कायद्यानुसार एखादा मुलगा दोषी आढळला तर त्याला जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत कारावास आणिदंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. परंतु हा कायदा अनेक वृद्धांना माहितीही नाही.पोटच्या मुलाच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर साºया जगाला कळेल, अशीही आतून त्यांना हुरहूर असते. त्यामुळे आईवडिलांची वृद्धापकाळातील परवड समाजासमोर येत नाही.

उतारवयात आपली कोणी दखल घेणार नाही आणि घेतलीच तरी पोलीस ठाणे अन् न्यायालयात हेलपाटे मारणे थकलेल्या शरीराला शक्य होणार नाही, अशी धास्ती असल्यामुळे पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारींची संख्या अत्यंत नगण्य आहे. गेल्या दोन वर्षांत सातारा जिल्ह्यात केवळ सात जणांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.