शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

१५ तासानंतर ते पडले पुरातून बाहेर

By admin | Published: September 13, 2016 5:57 AM

रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली.

भामरागड (गडचिरोली) : रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. मात्र पर्लकोटाच्या पुलावर पाणी असताना एक ते दोन फूट पाण्यातून शेकडो महिला व नागरिकांनी आपल्या घराची वाट धरली.राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विविध समस्यांनी सतत त्रस्त असलेल्या भामरागडला यंदा पावसाने बेजार करून टाकले आहे. पर्लकोटाच्या पुरामुळे रविवारी दिवसभर भामरागडचा संपर्क तुटलेला होता. सायंकाळी ५ वाजता दळणवळण सुरू झाले तोच पुन्हा रात्री पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढल्याने सोमवारी दिवसभर भामरागडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारी ३.५४ वाजता पुलावर एक फूट पाणी असताना १५ तासापासून अडकून पडलेल्या शेकडो महिला व नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाट काढत आपले गाव व घर जवळ केले. परस्परांना पकडून साखळी करत पुरातून या महिला चालत गेल्या. भामरागडचा या पावसाळ्यात किमान आठ ते दहा वेळा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ३० वाहने भामरागडात अडकली. त्यातील प्रवाशीही पुलावरील पाण्यातून चालत गेले. (प्रतिनिधी)पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़ त्यामुळे विदर्भ आणि तेलंगणा येथेही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़विसर्जनादिवशी पाऊसमराठवाडा व विदर्भात १३ ते १५ सप्टेंबर, कोकणात १५ व १६ सप्टेंबर आणि मध्य महाराष्ट्रात १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे़ त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.