शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

अखेर तीन कुटुंबे बहिष्कारमुक्त

By admin | Published: October 30, 2015 1:23 AM

जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.

संतोष कुंडकर, चंद्रपूरजादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.‘लोकमत’ने २८ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी या वृत्ताची दखल घेत, बुधवारी सायंकाळी मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांना तातडीने आंबोली येथे रवाना केले. तेथे महामुने यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. सर्वप्रथम गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या बहिष्कृत कुटुंंब प्रमुखांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनही बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बाबाराव महामुने यांनी गावकऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती दिली. हे कृत्य कसे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे काय दुष्पपरिणाम होतील, हे पटवून दिले. त्यानंतर हरिभाऊ पाथोडे यांनी दीड तास गावकऱ्यांचे प्रबोधन केले. अखेर गावकऱ्यांनी आपली चूक कबूल करीत, आजपासून आम्ही त्या तीन कुटुंबांवरील बहिष्कार मागे घेत आहोत, असे जाहीर करून यापुढे गावातील एकोपा कायम राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले. पोलिसांना तसे लेखी दिले. त्यामुळे बहिष्कार प्रकरणावर पडदा पडला.