शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

30 एप्रिलनंतर IPL सामने राज्याबाहेर हलवा- मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Published: April 13, 2016 5:24 PM

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर घेण्याचे आदेश दिले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडलेला असतानाच आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आहेत. 
आयपीएलच्या सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आश्वासन बीसीसीआयने मुंबई उच्च न्यायालयाला दिले असूनही न्यायालयाने एप्रिल महिन्यानंतर महाराष्ट्रात सामने खेळू देण्यास नकार दर्शवला आहे. 
 
९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या आयपीएलच्या ९ व्या सत्रात महाराष्ट्रात एकूण १९ सामने खेळवले जाणार होते. एप्रिलमध्ये ७ तर मे महिन्यात १२ सामने खेळवण्यात येणार असून त्यात २ सेमीफायनल व फायनलचाही समावेश आहे. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर हे उर्वरित सामने कुठे खेळवले जातील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
दरम्यान  मुंबई आणि पुणे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटींची मदत करणार  असल्याचे बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र हे सामने 30 एप्रिलपर्यंतच खेळवा असा आदेशच कोर्टानं बीसीसीआयला दिला आहे.
आयपीएलसाठी वापरलं जाणारं पाणी दुष्काळग्रस्तांना देण्यास तयार आहात का, असा प्रश्न कोर्टानं बीसीसीआयला केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयनं पाणी देण्यास सहमती दर्शवली असूनही,  30 एप्रिलनंतर राज्यात आयपीएल नको, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळतोय बीसीसीआय मुख्यमंत्री रिलीफ फंडला मदत करण्याचा विचार करतेय का, असाही सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला होता. त्यावर दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यास तयार असल्याचं बीसीसीआयनं न्यायालयाला सांगितलं होतं.