शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 1:01 PM

प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला केली.

मुंबई - विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मागे घेत असल्याची घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतून शेतकऱ्यांना सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर तातडीने सरकारकडून पाऊले उचलल्यामुळे शेतकऱ्यांनी लॉंग मार्च मागे घेण्याची घोषणा केली आहे. 

या मोर्चाचं नेतृत्व करणारे नेते जेपी गावित म्हणाले की, याआधी जितके मोर्चे आले त्यात एखादा मंत्री येतो आश्वासन देत होते. परंतु विधानसभेत आमच्या मागण्यांबद्दल सरकारला निवेदन द्यावे लागले. प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला केली. अनेकदा मोर्चावेळी मागणी मान्य होतात पुढे काहीच घडत नाही. निवेदन पटलावर वाचून दाखवतात. पटलावर निवेदन देतात पण कार्यवाही होत नाही. त्यामुळे तुमच्यावर विश्वास नाही असं आम्ही म्हटलं. त्यामुळे निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यवाही सुरू झाली असे लोकांचे फोन आम्हाला यायला हवेत असं त्यांनी सांगितले. 

त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आता तोडगा निघत आहे. सकारात्मक रिपोर्ट कार्यकर्त्यांकडून येतोय. नाशिक जिल्ह्यातील अनेक अधिकारी कार्यवाहीच्या कामाला लागले आहेत. आज सकाळी ९ वाजल्यापासून सरकारी कार्यवाही सुरू झालीय अशी कार्यकर्त्यांची माहिती आहे. प्रश्न समजून घेऊन अधिकारी तातडीने कारवाई करत आहे. याआधी मोर्चे निघाले परंतु सरकारने तात्काळ दखल घेऊन कार्यवाहीला सुरूवात झाली. सरकारी आदेशाचे अंमलबजावणी सुरू आहे ही खात्री झाल्यावर आज आम्ही शेतकरी लॉंग मार्च मागे घेतोय अशी घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली. 

दरम्यान, दिंडोरीहून निघालेल्या मोर्चाबाबत माध्यमांनी दखल घेतली. निघताना ५ हजार लोक होते. शेतकऱ्यांपर्यंत बातमी पोहचवली. आज आमच्या मोर्चाची ताकद १८ हजारांवर पोहचली. पहिल्यांदाच सरकारकडून निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणीला सुरूवात झाली त्याबद्दल मी सरकारचे आणि माध्यमांच्या प्रतिनिधीचे आभार मानतो असंही शेतकरी नेते आणि माजी आमदार जेपी गावित यांनी म्हटलं. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस