शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

By admin | Published: March 07, 2016 1:08 AM

एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला

पुणे : एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला. अखेर याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीकडे पाऊल टाकले. या नवीन अभ्यासक्रमाला अखेर ‘मुहूर्त’ लागला आहे. विद्यापरिषदेची महिन्याभरात मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. विद्यार्थी नक्की करतात तरी काय? अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना इतका वेळ लागतोच कसा? अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी नुकतीच विद्यार्थ्यांची कानउघाडणी करत विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता काही दिवसातच एफटीआयआयची २००८ व २००९ ची बॅच तब्बल आठ ते नऊ वर्षांनंतर संस्थेतून बाहेर पडणार असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तीन वर्षांच्या मर्यादित वेळेतच विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पडावेत, अशा नवीन अभ्यासक्रमाची रचना प्रशासनाने केली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि आवाका लक्षात घेत साडेतीन वर्षांच्या प्रयत्नातून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात अभ्यासक्रमाच्या निर्मित्तीत विद्यार्थ्यांचा सहभाग हा कदाचित पहिलाच प्रयोग ठरणार आहे.अभ्यासक्रमाच्या काहीशा किचकट प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत अडचणी येत आहेत. याकडे लक्ष वेधून अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलावे या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले.मात्र, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. एफटीआयआय ही संस्था १९६० मध्ये सुरू झाली. मात्र, १९७४ पासून या संस्थेचे कामकाज हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणानुसार चालते. ही एक स्वायत्त संस्था असल्याने वेळोवेळी गरजेनुसार या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. तरीही हा अभ्यासक्रम ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना पूर्ण करता आलेला नाही. उलट या वर्षांमध्ये दिवसागणिक वाढच होत गेली. या गोष्टीला एफटीआयआय प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा हे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी)नवीन विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली असून, लवकरच त्याचा निकालही लागणार आहे. महिन्याभरात विद्या परिषदेची अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल, त्यानंतर जुलैपासून हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.- उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय