शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

नऊ वर्षानंतर पांगरी नवघरेत निघणार बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक

By admin | Updated: November 5, 2016 00:04 IST

१४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही.

ऑनलाइन लोकमत

मालेगाव (वाशिम) , दि. 04  - १४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात पांगरी नवघरे गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार आहे.
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे ३८०० लोकसंख्या असून, त्यामध्ये ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. येथे १४ एप्रिल २००७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गटांतील नागरिकांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पांगरी नवघरे येथे १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ५ एप्रिल रोजी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेतचा प्रश्न समोर करून मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. या पृष्ठभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मिरवणुकीला परवानगी मिळावी म्हणून अपिल दाखल करण्यात आले. विद्यमान न्यायालयाने पांगरी नवघरे येथे मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याने, ५ नोव्हेंबर रोजी मिरवणूक निघणार आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.