शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

नऊ वर्षानंतर पांगरी नवघरेत निघणार बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक

By admin | Published: November 04, 2016 7:11 PM

१४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही.

ऑनलाइन लोकमत

मालेगाव (वाशिम) , दि. 04  - १४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात पांगरी नवघरे गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार आहे.
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे ३८०० लोकसंख्या असून, त्यामध्ये ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. येथे १४ एप्रिल २००७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गटांतील नागरिकांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पांगरी नवघरे येथे १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ५ एप्रिल रोजी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेतचा प्रश्न समोर करून मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. या पृष्ठभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मिरवणुकीला परवानगी मिळावी म्हणून अपिल दाखल करण्यात आले. विद्यमान न्यायालयाने पांगरी नवघरे येथे मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याने, ५ नोव्हेंबर रोजी मिरवणूक निघणार आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.