शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 6:02 AM

राज्यातील १२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्ष सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या गृह जिल्ह्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांत बदल्या करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात केली आहे. मात्र, मुंबईत असलेल्या १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यास गृहविभागाने असमर्थता दर्शवली असून, तसे पत्र आयोगाला दिल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून तसे प्रमाणपत्र मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांमार्फत निवडणूक आयोगाला द्यावे लागते. ऑगस्टमध्ये आयोगाने अशा बदल्यांचे निर्देश देऊनही सरकारने बदल्या केल्या नव्हत्या. शेवटी मुंबईत दौऱ्यावर आलेल्या आयोगाने रविवारी दोन दिवसांत या बदल्या करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारने सोमवारपासून बदल्यांना सुरुवात केली. मंगळवारी राज्यातील १२ उपअधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मोठ्या प्रमाणात होणार बदल्यानायब तहसीलदारपर्यंतच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार ‘महसूल’ने विभागीय आयुक्तांना दिले आहेत, तर विविध विभागातील बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात प्रशासन व पोलिस दलात मोठे फेरबदल  झालेले पाहायला मिळतील. 

नकार कशासाठी...?nमुंबईतील बदली पात्र १३० पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्याबाबत गृहविभागाने नकार दिला असून, तसे आयोगाला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.nमुंबईत उपनगर आणि शहर असे दोन जिल्हे आहेत; मात्र निवडणूक आयोगाकडून हा एकच जिल्हा गृहीत धरला जातो. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर नवीन जागी बदल्या केल्या तर मुलांच्या शाळेचा आणि निवासाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. nतसेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागी दुसरे अधिकारी नियुक्त केले तर त्यांनाही ही अडचण येणार आहे. त्यामुळे आम्ही या बदल्या करू शकत नाही, असे गृहविभागाने कळविले आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४