शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राजू शेट्टी

By admin | Published: June 10, 2017 6:37 PM

कर्जमाफीसह इतर मागण्यांवर सुकाणू समिती ठाम आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - शेतक-यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर सुकाणू समिती ठाम आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशातील शेतक-यांप्रमाणे तीव्र आंदोलन करू, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. 
 
पत्रकार परिषदेतील मुद्दे
कुणालाही वेठीस धरावं आमची अशी इच्छा नाही : राजू शेट्टी 
 
शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याची सुकाणू समितीची आग्रही मागणी
 
सातबारा कोरा करा, हमीभाव द्या, या मागण्यांसाठी समिती आग्रही 
 
सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सुकाणू समितीचे सदस्य जातील : राजू शेट्टी
 
सुकाणू समितीच्या वतीनं 35 जण चर्चेसाठी जाणार 
 
आमचे कुणासोबतही मतभेद नाहीत : शेकाप आमदार जयंत पाटील 
 
उद्याच्या बैठकीत सूर्याजी पिसाळ निघायला नकोत, यासाठी दक्षता घेतली आहे : शेकाप आमदार जयंत पाटील
 
अंतिम तोडगा निघेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार - सुकाणू समिती
 
 
शेतकरी संपासंदर्भात चर्चा करण्यासाठी सुकाणू समितीची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. राज्य सरकारच्या चर्चेच्या निमंत्रणासंदर्भात सुकाणू समितीतील सदस्यांची बैठकीत बोलणी झाली.  
 
या बैठकीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्यासह डॉ. अजित नवले, जयंत पाटील, अॅड.बीजी कोळसे पाटील उपस्थित होते.
दरम्यान,  मुंबईत झालेल्या बैठकीपूर्वी  सुकाणू समितीत फूट पडल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र शेकाप आमदार जयंत पाटील यांनी आमचे कुणासोबतही मतदभेद नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे प्रमुख असतील. तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चाधिकार मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
 
दरम्यान, शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, वीजबिल माफी, दुधाच्या दरांमध्ये वाढ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह इतर मागण्या सुकाणू समितीने लावून धरल्या आहेत आणि त्यासाठी 12 जूनला सरकारी कार्यालयांना घेराव आणि 13 तारखेला रेलरोकोची घोषणा केली आहे.