शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

खेड्यातच कृषी उद्योजक तयार व्हावेत- कुलगुरू

By admin | Published: February 25, 2017 2:21 AM

राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप; देशातील २५0 शास्त्रज्ञांची उपस्थिती

अकोला, दि. २४- ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत बदल घडवून आणायचे असतील, तर खेड्यातच उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. याकरिता कृषी प्रक्रियेवर आधारित 'उद्योजकता विकास' या विषयावर परिसंवाद घेणेदेखील काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्यावतीने २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवसीय ह्यशाश्‍वत जीवन शैलीह्ण कृषी प्रक्रियेवर आधारित ह्यउद्योजकता विकासह्ण या विषयावर कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी डॉ. दाणी बोलत होते. व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. बी.जी. बथकल, कृषी विभागाचे सहसचालक डॉ.एस.आर. सरदार, संशोधन संचालक डॉ.डी.एम. मानकर, विस्तार संचालक डॉ.पी.जी. इंगोले, अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, कापणीपश्‍चात संशोधन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांची उपस्थिती होती.डॉ. दाणी पुढे बोलताना म्हणाले, कृषी शेतमाल प्रक्रियेवर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गावागावांत उद्योजक निर्माण केले आहेत. या उद्योजक शेतकर्‍यांचा येथे सन्मान होणे हेच देशातील शेतकर्‍यांसमोर प्रेरणादायी ठरणारे आहे. हे शेतकरी खरे रोल मॉडेल ठरतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बथकल यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात भारत खूप पिछाडीवर असल्याचे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करायची असेल, तर ग्रामीण भागातच प्रक्रिया उद्योग व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी आता हे अपरिहार्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. इंगोले, डॉ. मानकर, डॉ. नागदेवे यांनी या संदर्भात विचार मांडले.परिसंवादाला देशातील या विषयातील २५0 पेक्षा अधिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकर्‍यांची उपस्थिती होती. या परिसंवादात ४३५ संशोधन पेपर्सचे वाचन करण्यात आले. येथे पोस्टर्स प्रदर्शन लावण्यात आले होते. २४ जणांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल कांबळे यांनी, तर आभार डॉ. प्रदीप बोरकर यांनी मानले.कृषी विद्यापीठाने केले उद्योजक तयार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रक्रिया यंत्र तयार केले असून, हे यंत्र शेतकरी व महिला बचत गटांना गावागावांत देण्यात आले आहेत. यासाठीचे तंत्रज्ञान त्यांना कृषी विद्यापीठाने पुरविले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुढाकाराने परिसंवाद व प्रक्रिया उद्योगाचे जाळे विदर्भात विणले जात आहे.