शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 05:41 IST

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

नाशिक/नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्य सरकार विरोधकांकडून घेरले जात असतानाच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडे होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शुक्रवारी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शनिवारी टीकेची झोड उठली आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले ते माहीत नाही. मात्र, सरकार म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो. फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे सांगितले.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर कोकाटे यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर शनिवारी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिला जाईल.

उपस्थित शेतकऱ्यांमध्ये माझे जवळचे मित्र होते. त्यांच्याशी मी थट्टामस्करीत बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शेतकऱ्यांवर कर्जाची वेळच येऊ नये. शेतकरी समृद्ध व संपन्न झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत त्या जाणीवपूर्वक दाखवतात.माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

काय म्हणाले कृषिमंत्री ?कोकाटे यांनी माडसांगवी (जि. नाशिक) येथे नुकसान पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील संवाद पुढीलप्रमाणे..एका शेतकऱ्याचा प्रश्न - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कर्जमाफी होऊ शकत नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही?कोकाटे - कर्ज घ्यायचं, पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायचं नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा...

नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून मदत देणारअवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. नागपूर व अमरावती जिल्ह्यामधील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. राज्यातसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार