शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे.

Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधाना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असंही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला आता नीट काम करावंच लागेल - माणिकराव कोकाटे

"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे - प्रवीण दरेकर

माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "हे सर्व विधान सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा मतीतार्थ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत निगेटिव्ह नव्हता. सकारात्मकतेच्या बाजूने आपल्याला जावं लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे. लोकांना कामाशी मतलब आहे. जर चांगली यंत्रणा तिथे असेल तेच महाराष्ट्रातील जनतेला तेच हवे आहे. ही जनता खुश होऊन सगळ्यांनाच आशीर्वाद देईल," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार