शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

By admin | Published: December 13, 2015 3:06 AM

शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते.

पुणे : शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचा प्रणेता गेल्याची भावना व्यक्त होत आहे़ जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून, त्या सोमवारी परतणार आहेत़ त्यानंतर अंत्यसंस्कार कधी व कोठे होणार, हे जाहीर करण्यात येणार आहे़ निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोपोडी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. शेतकऱ्यांशी समरस होण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे जमीन घेऊन शेती करण्यास सुरुवात केली़ शिकलेला आणि परदेशात राहिलेला पांढरपेशी माणूस काय शेती करणार आणि शेतीचे काय प्रश्न सोडविणार, असे सुरुवातीला त्यांच्याविषयी बोलले जात होते़ जोशी यांनी १९७९मध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी संघटना स्थापन केली़ ‘शेतमालास रास्त भाव’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन त्यांनी चाकण येथे सर्वप्रथम कांदा उत्पादकांचे आंदोलन उभारले़ त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला़कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांसाठी त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली़ त्यासाठी उपोषणे, मेळावे, तुरुंगवास, शिबिरे या मार्गांनी त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या़ शेती आणि शेतकरी यांचा अभ्यास असणारे अनेक नेते त्यांनी घडविले़ शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करणारी ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली़ विकसित देशांत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते, तर भारतात शेतकऱ्यांना उणे सबसिडी दिली जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले़ संपूर्ण भारतातील विविध शेतकरी संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, शेतकरी महिला यांच्यासाठीही काम केले़ शेतमालावरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ आपली ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली़------------------------------------अल्पपरिचयशरद जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला़ प्राथमिक शिक्षण बेळगाव व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले़ बँकिंग विषयासाठीचे सी रँडी सुवर्णपदक त्यांनी पटकाविले़ कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याते म्हणून काम केले़ १९५८मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय टपाल सेवेत रूजू झाले़ १९५८ ते १९६८ या काळात टपाल खात्यात काम करीत असताना, त्यांचा पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीचे प्रवर्तक म्हणून सहभाग होता़ वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली़ तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला़ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले़ त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले़ जुलै २००४ ते २०१० दरम्यान ते राज्यसभेचे खासदार होते़ खासदार म्हणून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठविला़ केंद्रात अनेक समित्यांवर भरीव काम केले़----------------------------------शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेचा जागतिक अभ्यासक आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशेती, शेतकरी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. - एकनाथ खडसे, कृषीमंत्रीशरद जोशी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. राज्यसभेत ते माझे सहकारी होते. काही विषयांवर आमचे वैचारिक मतभेदही होते, परंतु मला त्यांच्या त्यागाचा आणि प्रामाणिक निष्ठेचा नेहमीच आदर वाटत आला. शेतकऱ्यांमधील आत्मभान जागवून आपले प्रश्न ताठरपणे मांडायला त्यांनीच शिकविले. - खा. विजय दर्डा, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमनशेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वाढते वयोमान व आजारपण आडवे आले नसते, तर कदाचित अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच लढताना दिसले असते. - खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष