शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कृषी पंपांना मिळणार आता अखंड वीज

By admin | Published: September 07, 2016 5:23 AM

पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत आठच तास वीजपुरवठा करण्यात येत होता आणि तोदेखील बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी. या निर्णयाने शेतकऱ्यांना जादा काळ आणि तेही दिवसा वीज मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने येथील पिकांना पाण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महावितरणला दिले. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेत पाणी असूनही वीजेअभावी ते शेतीला देता येत नाही. त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास, पिकांना फायदा होईल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठऐवजी १२ तास वीजपुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, वीजपंपांना १२ तास वीज दिल्याने सबसिडीचा सुमारे ५०० कोटींचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यव होतो. ते रोखण्यासाठी आणि वीज चोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करु न तेथे वीजचोरीची तक्र ार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी वीज महामंडळामार्फत भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करु न वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याशिवाय, एका अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वात पथकही स्थापन करण्यात येईल.सौर ऊर्जेसाठी फिडरसौर ऊर्जापुरवठ्यासाठी आता स्वतंत्र फिडर उभारण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात लवकरच करण्यात येईल. या तालुक्यातील कर्जुले पठार व निमोण उपकेंद्र येथे प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील काळात सौर ऊर्जेच्या अधिक वापरावर भर दिला जाईल.