शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

महाराष्ट्रात साडेतीन हजार वर्षांपूर्वी केली जात होती शेती, मिळाले पुरावे; कोल्हापूरच्या संशोधकांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 6:53 PM

उत्खननात आढळली शेती अवजारे

संदीप आडनाईककोल्हापूर : गोंदिया जिल्ह्यात लोहयुगकालीन कृषी अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा प्रबंध ऑक्टोबर महिन्याच्या करंट सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीही महाराष्ट्रात शेती होत असल्याच्या पुराव्याला भक्कम आधार मिळाला आहे. मूळचे कोल्हापूरचे, पण सध्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विभागात पुरावनस्पती शास्त्राचे संशोधक असलेल्या डॉ. सतीश नाईक यांनी नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे डॉ. विराग सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे.गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मल्ली येथील पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये केले होते. हे स्थळ नागपूरपासून १३५ किलोमीटर पूर्वेस चोरखंबारा या वैनगंगेच्या उपनदीच्या डाव्या तीरावर आहे. यात आद्य लोहयुगकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले. याची पुष्टी वैज्ञानिक रेडिओ कार्बन डेटिंग पद्धतीने केली आहे. डॉ. नाईक यांनी मल्लीच्या उत्खननात ७९ मातीचे नमुने घेऊन जळालेल्या धान्याचे तरंगतंत्रज्ञानाद्वारे, प्रयोगशाळेत विलगीकरण करून संशोधन केले. यातून ४१७४ वनस्पतींचे अवशेष मिळाले.यात तांदूळ, वेगवेगळ्या तृणधान्य, कडधान्य, जंगली फळेवर्गीय वनस्पतींचे अवशेष आणि भात शेतीमधील तणांचे अवशेष आढळले. यात तांदळाचे प्रमाण ४८ टक्के होते. तृणधान्यांत कोडोमिलेट, सावा मिलेट, ब्राऊनटॉप मिलेट, फॉक्सटेल मिलेटस्चा समावेश होता. कडधान्यांत उडीद, मूग, कुळीथ, पावटा, लाख इत्यादी द्विदल वनस्पतींचे बी व तेलबियांत मोहरी आढळली. भात पिकाच्या तणांपैकी लव्हाळेवर्गीय वनस्पती, रिंकल ग्रास सापडले. जंगली फळांच्या बियांपैकी बोरं, वांगी मिळाली आहे. काळी मुसळी, डेफ्लावर, निळी या औषधी वनस्पतींचे अवशेषही आढळले.

उत्खननात आढळली शेती अवजारे

या प्राचीन स्थळाचा कालावधी ३४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट होते. येथे आद्य लोहयुगकालीन संस्कृतीची वसाहत आणि ४०० मेगालिथस कालावधीतील मानवी दफनभूमीचे अवशेष आहेत. यात मृदभांडी, शेतीची अवजारे, विळा, कुऱ्हाडी, सुरी, अशा लोखंडाच्या वस्तूही आढळल्या आहेत.

आद्य लोहयुगापासून औषधी वनस्पतींचा वापर भारत करीत आला आहे. निळीचा उपयोग मृद भांड्यावर रंगकाम, नक्षीकामासाठी केला असावा. आयुर्वेदात आजारावरही नीळ वापरल्याचे संदर्भ आहेत. विदर्भात तांदूळ हा ताम्रपाषाण काळापासून पिकवला जातो. मल्ली हे ठिकाण अतिपावसाच्या प्रदेशात असल्यामुळे येथे तांदूळ पिकवण्यासाठी अनुकूल, पोषक हवामान मिळाले. -डॉ. सतीश नाईक, पुरावनस्पती शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पुणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन