शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

वातानुकूलित एसटी आजपासून धावणार

By admin | Published: June 10, 2017 3:18 AM

कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवशाही एसटी मुंबई-रत्नागिरी मार्गावर शनिवारी मार्गस्थ होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी ‘शिवशाही’साठी प्रवाशाला ५५६ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ‘कोकणात वातानुकूलित एसटी सेवा सुरू होणार’ हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते.प्रवाशांची संख्या वाढावी आणि एसटीची अत्याधुनिक प्रतिमा प्रवाशांच्या मनात उमटवण्यासाठी एसटी प्रशासन भविष्यात विविध उपाययोजना राबवणार आहे. त्या योजनेंतर्गत वातानुकूलित एसटी प्रवास हा प्रयोग करण्यात येत आहे. कोकणातील वाढती प्रवासी संख्या पाहता शिवशाही ही अत्याधुनिक एसटी सर्वप्रथम मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर ती राज्यातील विविध भागांत लवकरच सुरू करण्यात येईल. एसटीची विश्वासार्हता आणि अत्याधुनिक व आरामदायक प्रवास यामुळे प्रवाशांना आणि प्रशासनाला फायदा होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी व्यक्त केले. सध्याच्या ‘हिरकणी’ या निमआराम बस तिकिटांच्या जवळपास शिवशाहीचे तिकीट असल्यामुळे वातानुकूलित एसटीला प्रवासी नक्कीच चांगला प्रतिसाद देतील, असेही देओल यांनी सांगितले. एसटीची वातानुकूलित बस सेवा नसल्यामुळे खासगी वाहतूक यंत्रणा अवास्तव भाडे आकारीत होत्या. यामुळे एसटीने वातानुकूलित सेवा सुरू केली आहे. परिणामी, आगामी काळात राज्यातील सर्व भागांत ही एसटी सेवा प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरू करण्यात येणार आहे.‘शिवशाही’ मुंबई - रत्नागिरी एसटी थांबेमुंबई सेंट्रल - दादर - कुर्ला नेहरू नगर - पनवेल - रामवाडी - माणगाव - महाड - भरणा - नाकाम - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरीशिवशाही एसटी दर (रुपये)मुंबई ते रत्नागिरी ५५६ मुंबई ते संगमेश्वर४८३मुंबई ते चिपळूण ४२०खासगी वाहतूक यंत्रणा मुंबई ते रत्नागिरी या वातानुकूलित प्रवासाच्या अंतरासाठी ७०० रुपयांपर्यंत तिकीट आकारते. हाच प्रवास शिवशाही एसटीने ५५६ रुपयांत करता येणार आहे. ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग जोरातच्लक्झरी प्रकारात येणारी ‘शिवशाही’ची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-रत्नागिरीसाठी १६ सीट आणि रत्नागिरी-मुंबईसाठी २८ सीटची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.च्मुंबईहून शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही एसटी सुटेल आणि रत्नागिरीला रविवारी सकाळी ७ वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून रात्री १० वाजता सुटेल आणि मुंबईला सकाळी ७ वाजता पोहोचेल.