शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे...!

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांची राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे. 

अजित पवार म्हणाले, "देश एक राहिला तर सेफ राहील, यात काय खराबी आहे. काहीच नाही. आपण सर्वजण एक राहिलो तरच सेफ राहू. यात काय खराबी आहे. यात काय अडचण आहे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही. 'सबका साथ सबका विकास', सर्वांचा... सर्वांचा... सर्वांचा विकास. तसेच आपण सर्वजण एक राहिलो तर सेफ राहू." यावर 'बटेंगे तो कटेंगे'? असे विचरले असता, पवार म्हणाले, "हे चुकीचे आहे, काय 'बटेंगा कटेंगा', असे शब्द महाराष्ट्रात वापरण्यात काही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विचार वेगळा आहे. कदाचित, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील लोकांचा विचार वेगळा असू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असे चालत नाही."

"आमच्या महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले आंबेडक यांची विचारधारा, शिव म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याला स्वीकार करणार नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी